उस्मानाबाद,दि.3:- जिल्हा प्रशासन , शिक्षण
विभाग जिल्हा परिषद आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 1 हजार 813 शैक्षणिक संस्थांमध्ये शासनाचे मुखपत्र “लोकराज्य” चे सामूहिक वाचन हा अनोखा उपक्रम
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी 11.00 वाजता जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे राबविण्यात
आला .
यावेळी श्रीपतराव भोसले हायस्कूल आणि आर्य चाणक्य
हायस्कूल येथे उस्मानाबाद शहरातील मुख्य
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते
यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले . श्री.
रायते म्हणाले की , “लोकराज्य” हे मासिक भविष्यास दिशादर्शक आहे . “लोकराज्य” चा
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर
खरोखरीच सकारात्मक परिणाम झाला असल्याचे
सांगून ते पुढे म्हणाले की , समाजातील
प्रत्येक घटकाला “लोकराज्य” मासिक उपयुक्त आहे . “लोकराज्य” चे सर्वांनी वर्गणीदार व्हावे .
त्याचबरोबर प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात
रोजच्या रोज “लोकराज्य” चे वाचन केले जाईल , अशी सूचनाच
त्यांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप
यांना सर्व शैक्षणिक संस्थांना
करण्याबाबत केली.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री. सचिन जगताप , जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप
, उप शिक्षणाधिकारी श्रीमती रोहिणी कुंभार
, श्रीमती आशा बंडगर आदी उपस्थित होते .
शासनाचे मुखपत्र “लोकराज्य” च्या सामूहिक वाचनाबरोबरच आज
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती आशा बंडगर यांनी लिहिलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित “नमन क्रांतीज्योतीला !” या
लेखाचेही सामूहिक वाचन यावेळी करण्यात आले .
प्रास्ताविकामध्ये जिल्हा
माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप म्हणाले की , सावित्रीबाई फुले ह्यांनी
संपूर्ण स्त्री जीवनाला आकार देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे , त्यामुळे आजच्या स्त्रियांना उंच भरारी घेण्यासाठी
त्यांच्या पंखामध्ये बळ निर्माण झालेले
आहे . त्याच बरोबरच श्री. सानप यांनी शासनाचे मुखपत्र “लोकराज्य” चे महत्व यावेळी उपस्थित
सर्व विद्यार्थ्यांना सांगितले व
वर्गणीदार होण्याचे आवाहनही केले .
पुढील एका आठवड्यात प्रत्येक शैक्षणिक
संस्थेमधून “लोकराज्य” सभासद नोंदणी
करण्यात येणार आहे .
या सामूहिक वाचनाच्या
उपक्रमानंतर जिल्हा परिषदेच्या “उमेद” या स्पर्धा परीक्षा केद्रांतील विद्यार्थींनींकडून स्पर्धा
परीक्षेचे महत्व पटवून सांगणारी एक नाटिकाही यावेळी आर्य चाणक्य हायस्कूलच्या
प्रांगणात सादर करण्यात आली .
यावेळी श्रीपतराव भोसले
हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुधीर पडवळ , शिक्षक श्री. कोळी , श्री. हजारे ,
श्री. घारगे व शिक्षकेतर कर्मचारी , आर्य चाणक्य शाळेचे प्रतिनिधी श्री.
मिलिंद पाटील , श्री. शेषाद्री डांगे , मुख्याध्यापक
श्री. मनीष देशपांडे , मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा देशमाने , संगीत शिक्षिका श्रीमती मीरा पवार , श्री. बाबासाहेब जगताप , श्री. प्रशांत जाधवर , श्री. उमाकांत कुलकर्णी , श्रीमती पाठक , उमेद
चे समन्वयक श्री. घोलप आणि श्री. शेख आदी उपस्थित होते . ****