उस्मानाबाद.दि.11:-
बरेच काही बोलून व सांगून जाण्याचे काम छायाचित्रामुळे होते,त्यामुळे त्याचे महत्व
अनन्यसाधारण आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले तर त्याचा समाज मनावर
चांगला परिणाम होतो, असे प्रतिपादन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आज येथे केले.
माहिती व
जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय व नेहरू युवा केंद्र
उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने
मंगळवार (दि.11) रोजी सकाळी 10.30 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला
हॉलमध्ये "महाराष्ट्र माझा" छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन विधान परिषदेचे
सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते उदघाटनपर
मार्गदर्शन करताना बोलत हाते. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय
अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, नेहरु युवा
केंद्राचे लेखापाल रामचंद्र कुलकर्णी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन
काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे
बोलताना आमदार ठाकूर म्हणाले की, काही छायाचित्र काही बोलून व सांगून जातात
त्यामुळे त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीही
सकारात्मक दृष्टीकोनातून काम केले तर शासनाच्या योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत
पोहचण्यास मोठा हातभार लागेल.
आता
उस्मानाबादची मागासलेपणाची ओळख कमी होत
चालली आहे, त्यामुळे यासाठी सर्वांनी कमी जास्त प्रमाणात योगदान देण्याची गरज
असल्याचे आमदार श्री.ठाकूर यांनी यावेळी बोलून दाखविले.
माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाने "महाराष्ट्र माझा" छायाचित्र स्पर्धेत निवडलेल्या 200 छायाचित्रात उस्मानाबादचे
छायाचित्रकार बाळासाहेब अणदूरकर व आरिफ
शेख यांच्या छायाचित्रांची निवड झाल्याबदल त्यांचा आमदार ठाकूर यांनी यावेळी सत्कार केला.
यावेळी आयुष
प्रसाद म्हणाले की, छायाचित्र काढणे ही एक कला असून ती जोपासण्यासाठी
छायाचित्रकारांनी त्या कलेबाबत इतरांनाही अवगत केले पाहिजे.
या
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नेहरु युवा केंद्राचे श्री. कुलकर्णी यांनी केले तर
प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले. यावेळी कृषी विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गोरे,
श्री. वारे, श्री. जाधव, लेखाधिकारी श्री. जोशी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय
इमारत परिसरात असलेल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, छायाचित्रकार, पत्रकार
मोठया संख्येने उपस्थित होते.
वृत्त.क्र.310
आमदार
सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन
उस्मानाबाद.दि.11:-
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने सुरु करण्यात
आलेल्या पाणपोईचे उदघाटन आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, नेहरु युवा केंद्राचे लेखापाल रामचंद्र
कुलकर्णी, कृषी विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गोरे,बांधकाम विभागाचे
श्री.लष्करे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
