वृत्त क्र. 259 दि.4 मे 2019
भारतीय
स्टेट बँक ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत
वुमन टेलर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
उस्मानाबाद,दि.4- भारतीय स्टेट
बँक ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद व जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणा, उस्मानाबाद यांच्यामार्फत 30 दिवस दि. 08
मे 2019 ते 07 जून 2019 या कालावधीमध्ये " वुमन टेलर प्रशिक्षण" या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात
आले आहे.
तरी 18 ते 45
वयोगटातील मुलांनी व महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी
दि. 06 मे 2019
रोजी सकाळी 10.00 वा आपली नाव नोंदणी करावी. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून
राहण्याची व जेवणाची सोय विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य्ा या
तत्वावर फक्त्ा 30 प्रशिक्षणार्थींनाच प्रवेश देण्यात येईल .
या प्रशिक्षण
वर्गास प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार
दारिद्र्य रेषेखालील असावा, बचतगटातील सभासद अथवा SECC-2011 यादीतील (
कौशल्य पंजी नोंदणीकृत ) सभासद असावा, ही पात्रता असून प्रवेशासाठी येताना 1) कच्या भिंतीचे,
कुडाचे किंवा पत्र्याचे शेड असलेलं घर 2) अत्यंत गरीब कुटुंब (PIP)3) कुटुंबामध्ये
कर्ता पुरुष नाही (विधवा प्रमाणपत्र) 4) कुटुंबात कर्ता पुरुष अपंग आहे 5) SC/ST
(प्रमाणपत्र) 6) कुटुंबात 25 वर्षापुढील साक्षर व्यक्ती नाही 7) भूमीहीन व
मोलमजुरी करणारे व्यक्ती (शेती नसलेले) या सात पैकी एक प्रमाणपत्र सोबत आणावे.
या
प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी 1) शाळा
सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट (टी .सी.) 2) दारिद्र्य रेषेखालील आसल्याचा दाखला
किंवा पात्रतेपैकी किमान एक दाखला. 3) आधार कार्ड/मतदान कार्ड 4) पासपोर्ट साईज 4 फोटो. 5) रहिवाशी
प्रमाणपत्र
6) बॅक पासबूक
कॉपी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिक
माहितीसाठी 1) संचालक – श्री. सावंत – 7875443799, 2) श्री. गोफणे – 9763624998, 3)
श्रीमती सरपाळे -7030320255, 4) श्री. शेख 9049410000,5) श्री. सुरवसे –
9552858521, 6) श्री.अवधूत पोळ-962379797 यांच्याशी मोबाइलवर किंवा सदन कुकुट पालन
ग्राउंड, (पशु वैद्यकीय दवाखाना जवळ )राम नगर, जॉनी हॉटेल शेजारी, औरंगाबाद रोड,
उस्मानाबाद येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा,असे आवाहन भारतीय स्टेट बँक ग्रामीण
स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक मिलींद सावंत यांनी केले आहे.
******
वृत्त क्र. 260 दि.4 मे 2019
फळांच्या बिया साठवून ठेवा
वृक्षलागवडीस सहाय्य करा
प्रशासनाचे नागरिकांना
आवाहन
उस्मानाबाद,दि.4- संपूर्ण भारतभर वृक्ष
लागवडीचे महत्त्व जनसामान्यांपासून ते अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच
कळून चुकले आहे. गेली दोन वर्षे वृक्ष लागवडीबाबत सर्वांनी गांभीर्याने एकत्रित
प्रयत्न करून एक आदर्शवत असे काम करून दाखवले आहे.
या वर्षीही उस्मानाबाद जिल्ह्यात
वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. यामध्ये प्रशासनाबरोबरच
लोकसहभागही महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना,
विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की, पुढील काही दिवस
आपण विविध फळांच्या बिया आपल्याकडे जमा करून ठेवाव्यात, या फळांच्या बिया प्रशासन
आपल्या स्तरावरून एकत्र करणार असून नंतर पावसाळ्यापूर्वी या बिया जिल्ह्यात
सर्वत्र जिथे शक्य आहे तिथे पेरण्यात येतील.
या अनोख्या उपक्रमास जास्तीत जास्त
नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी
पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, विभागीय
वनाधिकारी राजेश्वर सातेलीकर, सामाजिक वनीकरण चे विभागीय वनाधिकारी श्री.बेडके
आदींनी केले आहे.
******








