Wednesday, 5 September 2018

समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात -आमदार राणाजगजितसिंह पाटील


     गावच्या विकासासाठी एकजूट व लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज येथे केले. 
    शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात बुधवार दि. 5 सप्टेंबर 2018 रोजी  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पंचायत समिती सभापती (उस्मानाबाद) बालाजी गावडे,पंचायत समिती सभापती (कळंब) दत्तात्रय साळूंके, पंचायत समिती सभापती (वाशी) श्रीमती. भाग्यश्री हाके, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते, उध्दव साळवी, दत्तात्रय देवळकर, वैभव मुंढे, मदन बारकुल, महेंद्र धुरगुडे, सुरेश कोरे, उषाताई यरकळ, अस्मिता कांबळे, जयश्री खंडागळे, सुनिता जाधव, प्रविण खटाळ, शिक्षणाधिकारी (प्रा.) कलिमोद्दिन शेख, शिक्षणाधिकारी (मा) शिवाजी चंदनशिवे, उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.
     यावेळी पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. शिक्षकांनी मोठया प्रमाणात लोकसहभागातून शाळा सुधारल्या आहेत त्याचबरोबर गावांचा देखील कायापालट केला आहे. त्यामुळे प्रत्येक कामात शिक्षकांची साथ महत्त्वाची आहे. गावात लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सीएसआरच्या माध्यमातून शिक्षणासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन व्हावे, कौतुक व्हावे म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात येत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा यासारखे काम करावे, अशी आशा व्यक्त केली. शिक्षकांनी केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे.
यावेळी जिल्हा परिषद, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी मोठया प्रमाणात जिल्हा परिषदेच्या सेस मधून तरतूदही करण्यात येत आहेत. डिजिटल शाळा, आरओ प्लाँट, शाळेसाठी गॅस सर्व विद्यार्थ्यांना गणवेष, बूट, सॉक्स आदी उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील वर्षीपेक्षा जिल्हा परिषद शाळांची यावर्षी 12 हजार विद्यार्थी पटसंख्या वाढ झालेली आहे. त्याचबरोबर प्रश्नांची बँक तयार करुन सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील थकीत वीज बिलासाठी ही जि.प.सेस मधून 89 लाख रुपयांची तरतूद आगामी
   जि.प.सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात येईल. शिक्षण विभागात महाराष्ट्रात अव्वल स्थानी जिल्हा येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी सांगितले. 
    कांबळे अरुण नरहरी, फुलमामडी तौफी कुलआलम नुरुलअलीन, स्वामी रंजना कमलाकर, गायकवाड कमलाकर शामराव, खोसे उमेश रघुनाथ, देशमाने विजयकुमार गुरुनाथ, कांबळे तानाजी आप्पाराव, कांबळे सुब्राव गोरोबा, पखाले नामदेव भागवत, गादेकर विनोद भागवत, वाघोलीकर अभय शंकरराव, भोसले विजयकुमार बाबासाहेब, कांबळे तात्याबा बाबा, अंधारे अमोल रावसाहेब, बन बळीराम आदी 15 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कारांने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अमोल अंधारे, उमेश खोसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कलिमोद्दिन शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी श्रीमती. रोहीणी कुंभार यांनी मानले.  यावेळी शिक्षक, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.                

Tuesday, 4 September 2018

लोककला आणि पथनाट्य निवडसूची अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

             माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला व  पथनाट्य  यांची निवडसूचीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक संस्था आता दिनांक १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. इच्छुक संस्थांनी संबधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील इच्छुक संस्थांनी उपसंचालक (माहिती), कोकणभवन, नवी मुंबई यांच्याकडे अर्ज पाठवावेत असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

              शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड इत्यादी) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना निःशुल्क प्राप्त करून घ्यावा. अर्जाचे नमुने व माहिती www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.

Sunday, 2 September 2018

*"एकाच दिवशी-एकाच वेळी लोकराज्य मासिकाचं सामूहिक वाचन" हा उपक्रम यशस्वीपणे संप्पन्न* _एकूण १ लाख २६ हजार २२९ शिक्षक-विद्यार्थ्यांनी केले लोकराज्यचे सामूहिक वाचन_


          माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य वाचक अभियानांतर्गत " एकाच दिवशी एकाच वेळी लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन" हा उपक्रम आज जिल्ह्यात जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या एकत्रित प्रयत्नाने उत्साहाने, नीटनेटकेपणाने आणि यशस्वीपणे संप्पन्न झाला.
            सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण ५४० जिल्हा परिषद शाळांमधून हजार ८४५ शिक्षक,२९ हजार ५२२ मुले,२७ हजार ३२९ मुलींनी, खाजगी एकूण २०१ शाळांमधून हजार २७० शिक्षक,३३ हजार १२१ मुले,२८ हजार ६३५ मुलींनी आणि १० महाविद्यालयांमधील १०१ शिक्षक, हजार २०८ मुले, हजार १९८ मुलींनी लोकराज्यचे सामूहिक वाचन केले. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण हजार २१६ शिक्षकांनी, ६३ हजार ८५१ मुलांनी तर ५७ हजार १६२ मुलींनी (सर्व विद्यार्थी मिळून १लाख २१ हजार १३) आज लोकराज्यचे सामूहिक वाचन केले
        याची सुरुवात जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेतून म्हणजेच श्रीपतराव भोसले हायस्कूल येथून करण्यात आलीजवळपास तीन हजार विद्यार्थी आणि संस्थेचे अध्यक्ष सुधीरआण्णा पाटील , शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. कलीम शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी चंदनशिवे,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, विस्तार अधिकारी श्री.लोमटे, संस्थेचे प्राचार्य सुधीर पडवळ, उपप्राचार्य सिद्धेश्वर कोळी, संस्थेचे प्रशासकीय प्रमुख आदित्य पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय असा उपक्रम पार पडला.
            सुरूवातीस जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देताना शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक मराठी, हिंदीइंग्रजीउर्दू आणि गुजराती या भाषांमध्ये प्रकाशित होते. वार्षिक सभासद शुल्क फक्त शंभर रुपये असलेले हे मासिक आपल्या ज्ञानात मोलाची भर घालते. महाविद्यालयीन तरुण-तरुणींपासून ते गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत, समाजातील कोणत्याही घटकाला हा अंक म्हणजे माहितीचा स्त्रोत आहे,असे सांगून  जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, जनतेने लोकराज्यचे जास्तीत जास्त वाचन करावे असे आवाहन केले तसेच यामुळे सर्वांना शासकीय योजना समजतील आणि त्यामुळे गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि पर्यायाने आपल्या राज्याचा विकास होईल, ही जाणीव जागृती व्हावी म्हणूनच हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात राबविण्यात आला आणि तो अशाच प्रकारे संपूर्ण राज्यातही राबविण्यात येत आहे,असे सांगितले.
      शिक्षणाधिकारी डॉ.शेख म्हणाले,हा उपक्रम असाच चालू राहील यात शंकाच नाही.याबरोबरच लोकराज्य प्रश्नमंजुषा हा उपक्रमही शाळा-महाविद्यालयांद्वारे राबविण्यात येणार आहे तसेच लोकराज्यशाळा, लोकराज्य महाविद्यालय, लोकराज्यग्राम,लोकराज्य संस्था,लोकराज्य कार्यालय या उपक्रमांद्वारेही अधिकाधिक लोकांनी लोकराज्यचे सभासद व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
       संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना या अभियानाला जिल्ह्यात सर्वदूर पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
              यावेळी संस्थेचे प्राचार्य सुधीर पडवळ यांनी या विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी लोकराज्य चे सभासद होतील आणि लोकराज्य विषयीचे विविध उपक्रमही या विद्यालयात सातत्याने राबविण्यात येतील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कमलाकर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य सिध्देश्वर कोळी यांनी केले.
           हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंहउस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमेमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, संचालक अजय अंबेकर, संचालक शिवाजी मानकर, लोकराज्यचे संपादक सुरेश वांदिले आणि त्यांची  टीम लोकराज्य, औरंगाबादचे प्रभारी संचालक आणि उपसंचालक  यशवंत भंडारे या सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आणि प्रत्यक्ष काम करताना शिक्षणाधिकारी डॉ. कलीम शेख, शिवाजी चंदनशिवे, सय्यद अख्तर, नारायण मुदगलवाड, विवेकानंद कदम आणि तानाजी खंडागळे या सर्वांचे अमोल सहकार्य लाभले.