जिल्हयातील भूम तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये
शासनाकडून करण्यात आला आहे. दुष्काळ
व्यवस्थापन संहिता 2016 या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन
करण्यासाठी शासनाने भूम तालुक्याचा समावेश निश्चित केला आहे. त्यानुसार ट्रिंगर 2
लागू झालेल्या भूम तालुक्यामध्ये क्षेत्रिय स्तरावर ग्राउंड टुथिंगची कार्यवाही
शासनाने हाती घेतली आहे.
खरीप हंगामात सप्टेंबर 2018 अखेर
करण्यात आलेल्या मुल्यांकानुसार ट्रिंगर 2 लागू झालेला आहे. या तारखांतील 10 टक्के
गावे रॅंडम पध्दतीने निवडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहेत. पावसाअभावी टंचाई
दृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासनाने
प्राधान्य दिले आहे. आता याचा लाभ भूम
तालुक्यासाठीही शासनाकडून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून
वस्तूनिष्ठ माहिती सादर करण्याचे काम करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे यांनी संबंधित सर्व विभागातील
अधिकाऱ्यांना आदेश दिले असून स्वत: पालकमंत्री अर्जून खोतकर,जिल्हयातील सर्व
लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा
केल्याने भूम तालुक्याचा सदृश्य परिस्थितीचा आढावा घेवून ट्रिगर२ मध्ये समावेश
करण्यात आला आहे.