Saturday, 18 November 2017

ग्रंथोत्सावानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन


उस्मानाबाद.दि.18:- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय, अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 नोव्हेंबर 2017 ते दि. 22 नोव्हेंबर 2017 या कालावधीत  सांस्कृतिक सभागृह, आनंद नगर उस्मानाबाद या ठिकाणी भव्य ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि.21 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. तर ग्रथोत्सव या कार्यक्रमाचे उद्‌दघाटन परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा उस्मानाबाद श्री.दिवाकर रावते व पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा सहपालकमंत्री जिल्हा उस्मानाबाद श्री. महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख उपस्थिती, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, खासदार प्रा. रविंद्र गायकवाड आमदार सर्वश्री मधुकरराव चव्हाण, राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, राहुल मोटे, सतिष चव्हाण, दिलीपराव देशमुख, विक्रम काळे, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, सहाय्यक ग्रंथालय अधिकारी गाडेकर, राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य भास्कर चंदनशिव आदींची उपस्थिती राहणार आहे.
            मंगळवार दि.21 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत वाचनसंस्कृती वाढीसाठी सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी 4 ते 6 यावेळेत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.22 नोव्हेंबर 2017 रोजी  सकाळी 11 ते 1 या दरम्यान कथाकथन  हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 ते 3 वाजता स्पर्धा परीक्षा एक आव्हान हा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाचा समारोप दुपारी 3 ते 5 या कालावधीत माजी मंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग श्री.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत  होणार आहे.सायंकाळी 5 वाजता ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत. या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन व विक्री होणार आहे तरी  या ग्रंथोत्सवाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. अ.वा. सुर्यवंशी यांनी केले आहे. 

जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे


उस्मानाबाद.दि.18:- दुष्काळमुक्त जिल्हा, राज्य हा आपला सर्वांचा संकल्प आहे. त्यासाठी पाण्याचा थेंब नी थेंब वाचवायचा आहे, साठवायचा आहे, यासाठी जलयुक्त शिवार अभियानचे काम चांगल्या प्रकारे चालू असून या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे  प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज केले.
परंडा तालुक्यातील हिंगणगाव(बु) येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाऱ्याची पाहणी त्यांनी केली गावातील यमाई देवीच्या प्रांगणात ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, परंडा तहसिलदार अनिलकुमार हेळकर, कार्यकारी अभियंता अनिल कांबळे, उप अभियंता श्री.मोरे, सौदार गोरे, बळीराम मारकड, तुकाराम कुरुंद, नाना कदम, पंडीत गोरे, राहुल ठोंगे, प्रविण नवले, ज्ञानेश्वर ठोंगे, राहुल कुरुंद, अमोल दरेकर, सागर ठोंगे, अनुरुद्र गोरे, विजय कुरुंद  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होती.
मंत्री प्रा.शिंदे म्हणाले की,  जलयुक्त शिवार अभियानचे काम चांगल्या प्रकारे चालू असून ज्या पध्दतीने जलयुक्त शिवारचे काम चालू आहे त्यातून दुष्ळाळी परिस्थिती परत निर्माण होवूच शकणार नाही, या कामासाठी अजून निधी लागला तर निधी दिला जाईल.
यावेळी आमदार श्री.ठाकूर यांनी जलयुक्त शिवार च्या माध्यमातून या जिल्ह्यात, या तालुक्यात झालेल्या कामांमुळे दुष्काळ नक्की मिटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी जलयुक्त च्या कामासाठी चार कोटीचा सर्वाधिक निधी मंजूर केल्याबदद्ल त्यांचे आभार व्यक्त केले.

जलसंधारण विभागांतर्गत हिंगणगाव(बु) येथील बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची त्यांनी यावेळी पाहणी करुन जलपूजन केले.

Friday, 17 November 2017

विकासाबद्दलची संकल्पना माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे



उस्मानाबाद.दि.17:- विकास प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून माध्यमांनी सर्वसामान्य जनतेमध्ये असलेल्या विकासाबद्दलची संकल्पना तसेच त्यांचे प्रश्न माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा.कावेरी बने यांनी आज व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त माध्यमासमोरील आव्हाने या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रा.कावेरी बने  बोलत होत्या.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना प्रा. कावेरी म्हणाल्या की, विकास प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून माध्यमांनी सर्वसामान्य जनतेमध्ये असलेल्या विकासाबद्दलची संकल्पना तसेच त्यांचे प्रश्न माध्यमांनी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.ज्यांच्यापर्यंत इंटरनेट  सुविधा पोहचत नाही त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम प्रिंट माध्यमांनी करावे. राजकारणी व उद्योगपतीकडे माध्यमांचे जेवढे लक्ष असते तेवढेच लक्ष माध्यमांनी समाजातील सर्वसामान्य लोकांकडे असणे गरजेचे आहे. पत्रकारांची भूमिका महत्वाची असून माध्यम क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा उपयोग प्रभावीपणे पत्रकाराने करावा.
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रणदिवे यांनी माध्यमासमोरील आव्हाने, पत्रकारांना असलेले स्वातंत्र्य तसेच पत्रकारिता करताना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन केले.
जिल्हा उद्योग केंद्राचे श्री.मोरे यांनीही उद्योजकता या विषयावर पत्रकारांना यावेळी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर निसर्गोपचार पध्दती व पा्रत्याक्षिक आरोग्य शिबिरात डॉ.मनोज साळुंके व डॉ.गवळी  यांनी पत्रकरांना धावपळीचे जीवन जगावे लागत असल्याने आहार कसा असावा तसेच विविध शारीरिक व्याधी व त्यावरील उपाय व व्याधी होऊच नये म्हणून घेण्यात येणारी काळजी यावरील आयुर्वेदिक उपचार पध्दती  याविषयी  सविस्तर माहिती दिली.


प्रास्‍ताविक व आभार जिल्‍हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. यावेळी राष्‍ट्रीय पत्रकार दिनाच्‍या आयोजनाबद्दल माहिती दिली. जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, देवीदास पाठक, शिला उंबरे, श्री.जी.बी.रजपूत, गिरिष जव्हेरी, पांडूरंग मते, नरसिंग खिचडे, प्रशांत कावरे, संतोष जाधव, हुंकार बनसोडे, प्रमोद राऊत, भाऊसाहेब अणदुरकर, अरुण गंगावणे, शाहरुख सय्यद, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत कुलकर्णी, दत्तात्रय गायके, आकाश नरोटे, बिभीषण लोकरे, महेबुब फकीर, गंगावणे राजकुमार, रामेश्वर डोंगरे, धनंजय पाटील, योगेश कुलकर्णी, राजेंद्र अत्रे, निमजे ज्योतीराम, संजय रेणुके आदीसह जिल्हृयातील सर्व पत्रकार, संपादक, जिल्हा प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

Thursday, 16 November 2017

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जलयुक्त शिवार अभियान - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे





उस्मानाबाद.दि.16:- पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जात असल्यामुळे दरवर्षी दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो, त्यामुळे पाण्याचे महत्तव ओळखून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज केले. तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाऱ्याची पाहणी त्यांनी केली.       
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी चेतन शिरासे, गजानन वडणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, साहेबराव घुगे,ॲड.अनिल काळे, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, सचिन घोडके, इंद्रजित देवकते, पद्माकर घेडके,  सत्यवान सुरवसे, आबा करमुळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होती.
            मंत्री प्रा.शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत केलेल्या कामामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होवून त्यांचा विकास होणार आहे.
            आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट बंधारे, नदी, नाले खोलीकरण यासारख्या कामांना निधीची मागणी केली होती. त्यांच्या निधी मागणी प्रस्तावास मान्यता देत जिल्हयास 4 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केली.
            जलसंधारण विभागांतर्गत माळुंब्रा येथे 9.56 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची त्यांनी यावेळी पाहणी केली. त्याचबरोबर मौ.मसला दहीवडी येथे पाझर तलाव दुरुस्ती, तुळजापूर खुर्द येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करुन यावेळी मंत्री.प्रा.शिंदे यांनी जलपुजन केले.