उस्मानाबाद,दि.9:- जिल्हयातील धान्य साठवणूक गोदामासाठी सुरक्षा
रक्षक नेमून ज्या गोदामाला कंपाऊड नाही त्या गोदामाला कंपाऊडसाठीचा अहवाल पाठवून
देण्याची सूचना परिवहन, खार भूमी विकास मंत्री
तथा जिल्हयाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केली.
परिवहन, खार भूमी विकास तथा जिल्हयाचे
पालकमंत्री श्री. रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात
विविध विभागाच्या आढावा बैठका संपन्न झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,
आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी
अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी
आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर,
उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी
आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी सचिन बावसकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य
पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष
जमदाडे, जिल्हा माहिती अधिकरी मनोज शिवाजी सानप,विभागीय वन अधिकारी राजेश्वर
सातेलीकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी पालकमंत्री श्री.रायते
यांच्या हस्ते e-POS ऑनलाईन धान्य वितरण
प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला व प्राथमिक स्वरूपात यावेळी पाच लाभार्थ्यांना
धान्याचे वाटप देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब
गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत जिल्हयातील दहा लाभार्थींना जमिन प्रदान
प्रमाणपत्राचे वाटप ही पालकमंत्री श्री. रायते यांच्या हस्ते करण्यात आले.
वृक्ष लागवड आढावा
बैठकीत शहरी भागात फळझाडे लावा तर ग्रामीण
भागात शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना केल्या.