Friday, 30 December 2016

“बेसिक फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी प्रशिक्षणातून स्वयंरोजगार”


           उस्मनाबाद,दि.30:- स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील 18 ते 45वयोगटातील पुरुषांसाठी 10 ते 30 डिसेंबर 2016 या 21 दिवसाच्या कालावधीत  बेसिक फोटोग्राफी व्हिडिओग्राफीया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा निरोप समारंभ दिनांक 30डिसेंबर 2016 रोजी श्री.अमोल देवलसी, ग्रामीण जीवन्नोती अभियान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, छ.शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
याप्रसंगी   नायब तहसिलदार   श्री. रामदासी, श्री. पांडुरंग वारे, प्रशिक्षक श्री. माळाळे , अर्बन बँक मॅनेजर श्री. धनंजय कुलकर्णी, श्री श्रीराम क्षीरसागर तसेच स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे  संचालक श्री. मिलिंद सावंत व कर्मचारी उपस्थितीत होते.
संस्थेचे संचालक श्री. मिलिंद सावंत यांनी संस्था स्थापनेपासूनचा आढावा घेताना आजतागायत 105 प्रशिक्षण कार्यक्रमय यशस्वीपनणे राबविले असून 3 हजार 64 पुरुष व महिला उमेदवारांना  या संस्थेकडून प्रशिक्षण दिलेले आहे. त्याचप्रमाणे १हजार ५७३ प्रशिक्षणार्थ्यांनी स्वयंरोजगार सुरु केलेला आहे. प्रशिक्षण कालावधीत निवास व भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत मोफत केलेली असून वितरित केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे स्वयंरोजगार सुरु करू शकतात असे श्री. सावंत यांनी प्रास्ताविकात केले .
तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कमीत कमी 2 वर्षापर्यंत संस्थेतर्फे प्रशिक्षनार्थ्याचा पाठपुरावा केला जातो आणि स्वतच्या पायावर उभे केले जात असल्याचे यांनी  प्रतिपादन केले.         
 “ शोभेच्या वस्तू बनविणे प्रशिक्षण याबाबत पुढील प्रशिक्षण देण्यात येणार असून ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील 18 ते 45 वयोगटातील महिलांसाठी दि.१ जानेवारी ते ३० जानेवारी २०१७. या ३० दिवसाच्या कालावधीसाठी आहे. प्रवेशासाठी 02472 - 222124 किंवा 7875443799 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करून प्रशिक्षणार्थ्याना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
निरोप समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना श्री.अमोल देवलसी, ग्रामीण जीवन्नोती अभियान, उस्मानाबाद यांनी  प्रशिक्षाणार्थ्यांना ग्राहकाची गरज ओळखून  त्याला जे हवे आहे ते देणे आणि आपल्या उद्योगात भर पाडणे याविषयी सांगून त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी पाहिजे, जिद्द-चिकाटी , प्रामाणिकपणे काम, आपले भविष्य आपण घडवू शकतो हे सांगितले व आपला उदयोग सुरु करण्याचे आवाहन केले.त्यासाठी  लागणारे भांडवल पुरवठा बँका करतात असेही  सांगितले. तसेच  रोजगार मेळाव्यामधून आपण नोकरीसाठी  अर्ज  करू  शकता असे  सांगितले  आणि प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशिक्षणार्थी श्री. प्रवीण बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश सूर्यवंशी  यांनी  केले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.                                                                                                                                                         ******