उस्मानाबाद,दि.29:- लातूर
विभागातील प्रत्येक गावातील पात्र खातेदारांना प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी
संस्था , विविध कार्यकारी सेवा संस्थांचे
सभासद नोंदणी 31 मार्च 2017 पर्यंत 100 टक्के करावेत , अशा स्पष्ट
सूचना राज्याचे सहकार,पणन व वस्त्रोद्योग
मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विभागीय आढावा बैठकीत दिल्या.
उस्मानाबाद येथील जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित विभागीय आढावा बैठकीस लातूर विभागाचे विभागीय सह संचालक श्री.
श्रीकांत देशमुख , मंत्री महोदयांचे सचिव
श्री. संतोष पाटील , लातूर विभागातील उस्मानाबाद , बीड ,लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक , सह
जिल्हा निबंधक , जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-1 , लातूर विभागातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती , उपसभापती या बैठकीस उपस्थित होते .
बैठकीस मार्गदर्शन करताना
सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की , लातूर विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात आपल्या जिल्ह्यात
डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन
करण्यासाठी प्रयत्न करावेत .
श्री. निशिकांत गुळवे आणि श्री. दादाराव या दोन शेतकऱ्यांच्या
जमीनी उस्मानाबाद जिल्ह्यातील
सावकारांच्या पाषातून सोडवून या शेतकऱ्यांना यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते
शेत जमिनी परत केल्याबाबतचे प्रमाणपत्र व पुष्पहार घालून यावेळी गौरविण्यात आले.
यावेळी सहकार विभागातील
कर्मचाऱ्यांच्या मागणींकडे लक्ष वेधताना मंत्री महोदय म्हणाले की , सहकार
विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांगबाबत सहानुभूती पूर्वक विचार करुन येणाऱ्या
काळात त्यांचे प्रश्न निकाली काढण्यात येतील असेही त्यांनी आश्वासन दिले .
या बैठकीमध्ये जिल्हा उप निबंधकांनी 30 सप्टेंबर अखेर खरीप पीक कर्जवाटपाची माहिती , रब्बी पीक कर्ज वाटपाची माहिती , शासकीय कर्ज , भाग
भांडवल , थकहमी शुल्क , थकीत लेखा
परीक्षण शुल्क , शासकीय वसुलीचा आढावा , सावकारी कायदा कलम 18(1) अन्वये दाखल प्रकरणांकरिता
कार्यवाहीचा आढावा , सहकारी खरेदी
विक्री संघाचे बळकटीकरण, शेतमाल
तारण योजनेची अंमलबजावणी , तोट्यात गेलेले खरेदी विक्री संघ , अडचणीतील
नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाचाआढावाही यावेळी मंत्री महोदयांनी घेतला . *****


