उस्मानबाद,दि.18:- माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकरी कार्यलय येथे जिल्हाधिकरी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद
रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवसी
उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, शिक्षणाधिकारी माध्यमिक औदुंबर उकिरडे, जिल्हा माहिती अधिकारी
मनोज सानप, शिक्षणाधिकारी प्राथमिक सचिन जगताप,
कोषागार अधिकारी विशाल
पवार, उमेदचे शेख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी प्रथमच जिल्हयातील इयत्ता 10 वी व 12 परीक्षेसाठी पर्यवेक्षाकामध्ये बदल केला आहे. ज्या शाळेमध्ये परीक्षा केंद्र आहे. त्या शाळेतील शिक्षक परीक्षेसाठी घेण्यात
येणार नाहीत तर दुसऱ्या शाळेतील शिक्षकाची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
बारावीची परीक्षा दिनांक 28 फेब्रुवारी पासून सुरू होत असून या परीक्षेचे
जिल्ह्यात 37 केंद्र असून 17 हजार 200 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा दिनांक 7 मार्च पासून सुरू होत
असून 79 केंद्रांवरून 24 हजार 892 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॅापीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रत्येक केद्रांवर
बैठे पथक, भरारी 8 पथक तसेच परीक्षा केंद्रवार मोबाईल सोबत ठेवण्यास सक्त मनाई असून परीक्षा केंद्राच्या
सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी
प्रक्रिया संहिता 144 कलम लागू करण्यात येईल.
केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटी
केंद्रावर
गैरप्रकाराला आळा घालण्यासोबतच चांगल्या वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार
आहेत. त्यांच्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक सुध्दा भेटी देतील.
केंद्राच्या ठिकाणी परीक्षेसह इतर व्यवस्था
सुरळीतपणे आहे का याची पाहणी ते अचानक भेटीत करणार
आहेत.