Wednesday, 15 February 2017

शेतकऱ्यांनी एकत्र येवून शेतीतील इंद्रधनुष्य क्रांती करावी -डॉ. उमाकांत दांगट









उस्मानाबाद,दि.15:- आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद, कृषी विभाग , आत्मा प्रकल्प व जिल्हा सीड फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेडिओ किसान दिनानिमित्त आकाशवाणी किसान पुरस्कार 2017 वितरण सोहळा  आज  दि.15 फेब्रुवारी 2017 रोजी सारोळा (बु) ता. उस्मानाबाद  पार पडला .
 शेती म्हणजे समग्र व सर्वंकष  कृषी विकास होय , शेतकऱ्यांनी फक्त शेती उत्पादनावर  अवलंबून न राहता प्रक्रिया व मार्केटींगकडेही लक्ष द्यावे , शेतकरी व ग्राहक मूल्यवर्धित साखळी निर्माण करावी , सीड चैन निर्माण  करावी तसेच  पॉली हाऊस प्रमाणेच नर्सरीचीही निर्मिती करावी , यातून  हरित क्रांती , नील क्रांती , श्वेत क्रांती ह्या क्रांती आता काळाच्या आड गेल्या आहेत . आता शेतीतील इंद्रधनुष्य क्रांती करावी  अशी आशा या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष तथा निवृत्त विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
या पुरस्कार वितरण  सोहळ्यास निवृत्त विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.शिरीष जमदाडे, उर्जा विकासचे महाव्यवस्थापक श्री. विजयानंद काळे, क्रीडा विभागाचे संचालक श्री. जनक टेकाळे,  प्रकल्प संचालक (आत्मा) श्री.व्ही.एम. हिरेमठ ,  जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, उपसंचालक (आत्मा)  श्री. सुभाष चोले, उर्जा विकासचे विभागीय अधिकारी  श्री. निर्मळ, श्री. के.व्ही. देशमुख, श्री. तानाजी शिनगारे, जिल्हा सीड फेडरेशनचे एम. डी. ॲड अमोल रणदिवे, आदी उपस्थित होते .
या  पुरस्कार सोहळ्याची सुरुवात  भोळी भाबडी माणसं, लय पुण्यवान माती,  संत-महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची या गीताने करण्यात आली .हे गीत आकाशवाणीच्या कलाकार वृंदानी सादर केले.
तसेच  या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित शेतकऱ्यांना  श्री. के.ही.देशमुख , ॲड. अमोल रणदिवे , श्री. सुभाष चोले,  उर्जा विकासचे महाव्यवस्थापक  श्री. विजयानंद काळे , महाउर्जाचे विभागीय अधिकारी श्री. मधुकर निर्मळ यांनी सीड हब स्थापित करणे ,  औजारे बँक स्थापित करणे व गरजू शेतकऱ्यांना औजारे भाड्याने देणे , सेंद्रीय शेतीमुळे उत्पादनामध्ये वाढ होते आणि पर्यावरणाचा, जमिनीचा व आरोग्याचा ऱ्हास होत नाही , रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे दुष्परिणाम होत आहेत त्याऐवजी दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क ही जैविक खते वापरावीत, खते कमी प्रमाणात वापरल्याने जमीनीचा पोत सुधारतो, सौरपंपाच्या वापराचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना दाखविले .शेतकऱ्यांना 95 टक्के एवढ्या सबसिडीवर महाउर्जाकडून सौरपंप वितरीत करण्यात येतात . तर नाबार्डमार्फत 40 टक्के सबसिडीवर सौरपंप शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिला जातो असे मार्गदर्शन या सर्वांनी केले.
या पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणी किसान लक्ष्मी पुरस्कार 2017 -श्रीमती प्रतिभा काळे,श्रीमती सविता माळी, श्रीमती गुणाबाई  राठोड,  श्री. वंदना  ननवरे,श्रीमती प्रमोदिनी शिंदे, श्रीमती स्वाती रणनवरे,  श्रीमती सुनंदा नवटाके , श्रीमती मनिषा टेकाळे  यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपटे , स्मृतीचिन्ह, पुष्प , सन्मानपत्र  व रोख बक्षीस ही यावेळी प्रदान करण्यात आले .
आकाशवाणी किसान पुरस्कार 2017- श्री. धनंजय घोटाळे, श्री. लक्ष्मण सावंत,श्री.विलास  गपाट,श्री. बालाजी पवार,  श्री. नवनाथ शेवाळे , श्री. रामलिंग मुळे , श्री. कैलास   केसरे, श्री. सचिन पाटील  यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपटे , स्मृतीचिन्ह, पुष्प , सन्मानपत्र  व रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.


--2--
आकाशवाणी किसान मित्र पुरस्कार-2017-श्री. विनायक हेगाणा आणि  दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चिफ श्री. चंद्रसेन  देशमुख यांना प्रदान करण्यात आला .
विशेष पुरस्कार : प्रथम पुरस्कार- कळंब येथील दुध उत्पादक मराठवाडा ॲग्रो प्रोसेस कंपनी,  द्वितीय पुरस्कार श्री तुळजाभवानी शेतकरी गट , शेळगाव धानोरा तर तृतीय पुरस्कार रॉयल फार्मर्स बिजोत्पादन कंपनी , गुंजोटी या शेतकरी कंपन्यांचाही विशेष सत्कार  यावेळी करण्यात आला .
विविध जाहिरात संस्था– मे . संकल्प पब्लीसिटी – श्री. संजय मैंदरगे, मे. रिलायबल ॲडव्हर्टायझिंग एजन्सी- श्री. संजय पाटोळे आणि मे . वेदांत ॲडव्हर्टायझिंग एजन्सी – श्री. देविदास पाठक यांचाही  यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
विशेष सहकार्य पुरस्कार : श्री. कलाध्यापक श्री. शेषनाथ  वाघ आणि प्रा. भालचंद्र जाधव . आणि जिल्हा  कृषी अधीक्षक  श्री. शिरीष जमदाडे , प्रकल्प संचालक (आत्मा) श्री. हिरेमठ ,  उपसंचालक (आत्मा) श्री. चोले आणि श्री. संजय बरीदे  यांचाही परीक्षक म्हणून यावेळी सत्कार करण्यात आला .
या पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक  आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी संजय बरीदे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये श्री .बरीदे यांनी  कार्यकमाची थोडक्यात माहिती सांगितली आणि या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दौलत निपाणीकर आणि  श्रीमती शिवलीला तुगावे यांनी केले तर आभार आकाशवाणीचे प्रसारण  अधिकारी  कृष्णा शिंदे  यांनी केले .