Monday, 24 April 2017

सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती/संस्थांनी अर्ज करावेत


उस्मानाबाद , दि.24:- सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार , शाहू , फुले, आंबेडकर पारितोषिक , पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार सन 2017-18 या वर्षाकरिता येणार आहेत.
तरी याकरिता सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय  काम केलेल्या  विविध संस्था/व्यक्तींनी आपले प्रस्ताव दि. 30 एप्रिल 2017 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय , उस्मानाबाद  येथे कार्यालयीन  वेळेत सादर करावेत . 
तसेच अधिक माहितीसाठी  कार्यालयाच्या 02472-2223133  या दूरध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा तसेच माहिती  व अर्जाकरिता https://sjsa.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर पाहावे , असे सहायक आयुक्त श्री. एस.एस. मते यांनी कळविले आहे .
पात्रता– व्यक्ती -  सामाजिक  क्षेत्रात म्हणजेच अनु.जाती /जमाती भटक्या  व विमुक्त जातीचे कल्याणकारी  कार्य, तसेच  शारिरीक व मानसिकदृष्ट्या  मनोदूर्बल, अपंग , कुष्ठरोगी इ. सामाजिक दूर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे  नामवंत समाजसेवक  असावेत , सामाजिक कल्याण क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत ,  पुरस्काराकरिता पुरुषाचे वय 50 वर्षे पूर्ण असावे, महिलांचे वय 40 वर्षे पूर्ण असावे ,  कोणत्याही  व्यक्तीस  त्याच्या आयुष्यात  एकपेक्षा  अधिकवेळा  पुरस्कारासाठी  पात्र समजण्यात येणार नाही ,  समाज भूषण  पुरस्कार  मिळण्यास जात , धर्म , लिंग , क्षेत्र  याबाबीचा विचार केला जाणार नाही , पुरस्कार मिळण्यास  आमदार , खासदार , जिल्हा परिषदेचे  सदस्य किंवा कोणत्याही पदाधिकारी  पात्र  असणार  नाहीत .
सामाजिक  संस्था -  सामाजिक संस्था ही पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 वा सोसायटीज  रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार  पंजीबध्द असावी , संस्था राजकारणापासून अलिप्त असावी , तसेच कार्य  व सेवा  ही पक्षातील  व राजकारणापासून स्वतंत्र्य अलिप्त असावीत ,  सामाजिक कल्याण क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत , पुरस्काराकरिता पुरुषाचे  वय 50 वर्षे पूर्ण असावे तर महिलांचे वय 40 वर्षे पूर्ण असावे .