उस्मानाबाद,दि.25:- जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागाकडून
शासनाच्या विविध योजना जिल्हयात राबविण्यात येतात. या योजना राबविताना नागरिकांच्या
तक्रारीचा वेळेत निपटारा होत नाही,त्यामुळे दि.26 व 27 एप्रिल 2017 या कालावधीत सकाळी
11 ते 5 यावेळेत तीन ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम विकास लोक अदालत घेण्यात येणार
आहे.
जिल्हा
परिषद अंतर्गत येणाऱ्य सर्व विभागातील कामकाज, ग्रामस्थांच्या तक्रारी, प्रलंबीत कामे
याबाबत निपटारा करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद
येथे ग्रामविकास लोक अदालत प्रमुख व सहाय्यक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) तर यामध्ये समाविष्ठ अधिकारी - गट विकास अधिकारी व पंचायत
समिती स्तरावरील विभाग प्रमुख, भूम येथे ग्रामविकास लोक अदालत प्रमुख व सहाय्यक म्हणून
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं)
तर समाविष्ठ अधिकारी - गट विकास अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील विभाग प्रमुख, उमरगा
येथे ग्रामविकास लोक अदालत प्रमुख व सहाय्यक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
व उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक मनरेगा तर समाविष्ठ अधिकारी - गट विकास अधिकारी व पंचायत
समिती स्तरावरील विभाग प्रमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उस्मानाबाद
येथे उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब येथील नागरिकांनी, भूम येथे भूम, परंडा व वाशी
येथील नागरिकांनी तर उमरगा येथे उमरगा व लोहारा येथील नागरिकांनी ज्यांचे
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर कामे प्रलंबीत आसून त्याचा
निपटारा झालेला नाही अशा सर्व नागरिकांनी
दि.26 व 27 एप्रिल 2017 या कालावधीत संबंधीत ठिकाणी आवश्यक कागदपत्रे,
पुराव्यासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. आनंद रायते यांनी केले आहे.