Thursday, 13 August 2026

महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी १७ ऑगस्टला महिला लोकशाही दिन गरजू महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन

महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी १७ ऑगस्टला महिला लोकशाही दिन गरजू महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन धाराशिव दि.१४ ऑगस्ट (जिमाका) समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह महिलांच्या तक्रारींचे शासकीय यंत्रणेकडून तातडीने निराकरण व्हावे,या उद्देशाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार,दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली हा महिला लोकशाही दिन होणार आहे.महिलांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी,तसेच संबंधित तक्रारींचे शासकीय यंत्रणेकडून प्रभावीपणे निराकरण व्हावे,यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो.या माध्यमातून समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपले प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडता येतात. महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार सादर करताना ती वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे.न्यायप्रविष्ट प्रकरणे,सेवा विषयक किंवा आस्थापनाविषयक प्रकरणे तसेच अपूर्ण अथवा अर्धवट माहिती असलेले अर्ज महिला लोकशाही दिनामध्ये सादर करता येणार नाहीत. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दि.१७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील गरजू, समस्याग्रस्त व पीडित महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर लक्ष्मण गोरे यांनी केले आहे. ******