Saturday, 18 March 2017

लोहारा तालुका हागंणदारीमुक्त व्हावा, नागरिकांना सहकार्याचे आवाहन


          उस्मानाबाद.दि.17 देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांनी स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) ही महत्वकांक्षी योजना सुरु केलेली असून, दि.31 मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करावयाची घोषणा नुकतीच केलेली आहे. त्या अनुषंगाने लोहारा तालुका हागणदारीमुक्त होण्याच्या टप्प्यावर असून, दि.31 मार्च 2017 पूर्वी लोहारा तालुका हागणदारीमुक्त व्हावा असा सर्वांचाच संकल्प आहे.

          तेव्हा लोहारा तालुक्यातील सर्व नागरिकांनी लोहारा तालुका हागणदारीमुक्त होण्यासाठी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन ही मोहिम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन  पंचायत समिती, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्ष, लोहारा यांनी केले आहे.