उस्मानाबाद.दि.18:-सध्याच्या हवामान बदलामुळे ताप,
घसादुखी, घस्याला खवखव, खोकला, नाकगळणे, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे आढळून येत
आहेत. ही लक्षणे स्वाईन फ्ल्यू , डेंग्यू,
मलेरिया अशा आजाराचे असू शकतात, यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगून साथरोग
आजाराबाबत सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी श्री.आनंद रायते
यांनी केले आहे.
साथरोग
स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना
बोलत होते. या आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे उपस्थित
होते.
यावेळी
मार्गदर्शन करताना श्री. रायते म्हणाले ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी ,
वैद्यकीय अधिकारी, शहरी भागात वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अशा
लक्षणाचे रुग्ण आढळून आल्यास त्या गावात तात्काळ भेट देवून प्रतिबंधात्मक उपचार
करावेत. जिल्हास्तर, तालुकास्तर व क्षेत्रीय स्तरावर साथरोग किट ठेवण्यात यावीत
अशा संबंधितांना सुचना दिल्या. साथरोगाची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी नजिकच्या
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी करुन
घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
या
बैठकीस उपशिक्षणाधिकारी श्रीमती. कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी श्री. नानासाहेब
बोरकर, माताबाल संगोपन अधिकारी श्री. डॉ. कुलदीप मिटकरी, विस्तार अधिकारी श्रीमती.
मनिषा सुकाळे, सांख्यिकी अन्वेषक श्री. मिलिंद कांबळे, जिल्हा विस्तार व माध्यम
अधिकारी (प्र) श्री. अर्जून लाकाळ व सर्व
तालुका आरोग्य अधिकारी यांची
यावेळी उपस्थिती होती.