उस्मनाबाद,दि.16:- मराठवाडा मुक्ती संग्राम
दिनाच्या 69 वा वर्धापन दिन मराठवाडयातील
सर्व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य
परिवहन विभागात व त्यांच्या कार्यक्षेत्रातील आगारात साजरा केला जाणार असून, या समारंभानिमित्त राज्याचे परिवहन, खारभूमी विकास
मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते यांच्या हस्ते "स्वच्छ भारत अभियानाचा"
शुभारंभ एस.टी.बसस्थानक, उस्मानाबाद येथे
करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र.2
राज्य दपरिवहन मध्यवर्ती कार्यालय, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत, असे विभाग
नियंत्रक राज्य परिवहन उस्मानाबाद श्री.राजीव साळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.