उस्मानाबाद दि.1: मराठी भाषा
गौरवदिनानिमित्त जिल्हा ग्राहक तक्रार
निवारण मंचाच्या वतीने ‘उमेद’ स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये
निबंध व वक्तृत्व
स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत
प्रथम क्रमांक भाग्यश्री
लोंढे, द्वितीय क्रमांक पल्लवी
शिंदे, तृतीय क्रमांक स्वाती शेरकर यांनी मिळविला.यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा मंचाचे अध्यक्ष
श्री माधव विठ्ठल कुलकर्णी, सदस्य श्री मुकूंद भगवान सस्ते व माजी सदस्य श्री. देविदास वडगांवकर यांच्या हस्ते
पारितोषिकाचे वितरण करण्यात
आले.
यावेळी मान्यवरांनी कवी कुसुमाग्रज मराठी भाषा
गौरव दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे
श्री. य.श्री. मेकेवाड, प्रभारी प्रबंधक श्री सं. वि. कदम, लघुलेखक श्री. प्र.आ.नाईक,
लघुलेखक निम्न श्रेणी श्री. अ. शा. जेवळीकर, शिरस्तेदार तसेच
उमेद स्पर्धा परीक्षा केंद्राचे
निरंतर उपशिक्षणाधिकारी श्री. शेख,
विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री. घोलप,
श्रीमती आशा नवले व इतर
कर्मचारी उपस्थित होते.