उस्मानाबाद,दि.4:-बालकांच्या
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणांतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांना विनाअनुदानित आणि कायम
विनाअनुदानित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश कोटयाची तरतूद आहे.
वंचित ( एस.सी.एस.टी व विकलांग ) दुर्बल घटक (
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन रुपये 1 लाखापर्यंत आहे. अशा
खुल्या प्रवर्गासह,विमुक्त व भटक्या
जाती,इतर मागास, विशेष मागास व धार्मिक अल्पसंख्यांक मुस्लिम,
बौध्द,खिश्चन,पारसी,जैन,व शीख) यांच्यासाठी राखीव 25 टक्के आहेत.
तरी
पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी मिळणारी शाळा लॉटरी पक्रियेद्वारे निश्चित होणार
आहे. त्यासाठी दि.7 मार्च 2017 रोजी
विस्तार अधिकारी कक्ष, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद उस्मानाबाद या ठिकाणी दुपारी 11.00वाजता
ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया आयोजित केली आहे.यासाठी पालकांनी
उपस्थित राहावे,आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. सचिन जगताप यांनी केले
आहे.