उस्मानाबाद, दि. 14:- प्रसारमाध्यमे
हे लोकशाहीचे महत्वाचे अंग आहे त्यामुळे
बातमीमध्ये सत्यता असली पाहिजे आणि
बातमीचे शिर्षक हे कॅची असले पाहिजे . परंतू
पत्रकारितेतील स्पर्धा ही वाईट
असते, बातमी घेताना किंवा लिहिताना त्या
स्पर्धेतून समाजाचे नुकसान होऊन
नये ,असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आज केले .
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार
संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे
वितरण महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील, पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्या
हस्ते आज प्रदान करण्यात आले. जिल्हा
परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
त्यावेळी श्री. निकम हे बोलत होते.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या
वतीने सलग २२ वर्षापासून मराठवाड्यातील पत्रकारांना कै.अनंत भालेराव स्मृती
पत्रकारिता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते . विशेषवार्ता व शोधवार्ता अशा
दोन गटामध्ये स्पर्धा प्रवेशिका पत्रकारांकडून मागविल्या जातात. त्यामधून
पुरस्कारासाठी निवड केली जाते़ सन २०१३-१४ मधील ७ तर २०१५-१६ या वर्षात ६
पत्रकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष
धनंजय रणदिवे तर पुरस्कार वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी
डॉ.प्रशांत नारनवरे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज
शिवाजी सानप हेही उपस्थित होते .
या पुरस्कार वितरण सोहळ्यास पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, प्रांत
प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, संघटक
प्रशांत कावरे, विनोद बाकले, अमजद सय्यद, मल्लिकार्जुन सोनवणे, लक्ष्मीकांत शिंदे,
कैलास चौधरी, उपाध्यक्ष श्रीकांत कदम व अब्बास सय्यद, तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे,
सुरेश घाडगे, गौतम चेडे, बालाजी वडजे, विलास मुळीक, इक्बाल मुल्ला, सुभाष कदम या मराठवाड्यातील
पत्रकारांसह सर्व क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी
उपस्थितांना संबोधताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की , यशस्वी
लोकशाहीसाठी पत्रकारिता खूप आवश्यक आहे. लोकशाहीला बळकट करणारे काम ज्या पत्रकारांनी केले त्या पत्रकारांचा आज सन्मान करण्यात येत आहे .
२०१३-१४ चे पुरस्कार- उस्मानाबाद
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने २०१३-१४ सालचे कै. अनंत भालेराव स्मृती
पत्रकारिता पुरस्कार पुढीलप्रमाणे : शोधवार्ता गट - तुषार बोडखे (औरंगाबाद) प्रथम,
वामन पाठक (औसा जि.लातूर) द्वितीय, सचिन वाघमारे (पुणे) तृतीय, विशेषवार्ता गट -
हरी मोकाशे (लातूर) प्रथम, रवींद्र कुलकर्णी (नांदेड) व अनिल पोरवाल (हिंगोली)
द्वितीय तर सचिन वाघमारे (पुणे) यांना तृतीय पुरस्कार यावेळी ॲड. उज्वल निकम
यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह , शाल श्रीफळ व रोख रक्कम देवून प्रदान करण्यात आला .
तर २०१५-१६ चे कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार - शोधवार्ता
गटात संदीप अंकलकोटे (चाकूर,जि़ लातूर) प्रथम, दै. पुण्य नगरीचे प्रतिनिधी बालाजी
वडजे (उमरगा,जि़ उस्मानाबाद) द्वितीय,रमेश कदम (आखाडा बाळापूर, जि़ हिंगोली) यांना
तृतीय पुस्कार जाहीर झाला आहे़ विशेषवार्ता गटात हरीहर धूतमल (लोहा,जि़ नांदेड)
प्रथम, प्रदीप तरकसे (अंबाजोगाई, जि़ बीड) द्वितीय, चंद्रकांत तारू (पैठण, जि़
औरंगाबाद) तृतीय क्रमांक यांनी पटकावला
आहे . यांनाही यावेळी ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह , शाल श्रीफळ व
रोख रक्कम देवून पुरस्कार प्रदान करण्यात
आला .
यावेळी या स्पर्धेचे परीक्षक
देवीदास वडगावकर आणि राजेंद्र अत्रे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भैरवनाथ
कानडे , पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त
केले तर ज्येष्ठ पत्रकार राजा वैद्य यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले . यावेळी राज्य शासनाच्या पत्रकारिता
पुरस्काराकरिता पत्रकरांनी आपले अर्ज दि.
31 जानेवारी 2017 पर्यंत दाखल करावेत असेही
आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
****