Friday, 13 January 2017

विशेष सहाय्य योजनेतंर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे



            उस्मानाबाद, दि.13:- विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्वापकाळ योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना आदी योजनेतंर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी ज्या लाभाथ्‍र्यांची खाते राष्ट्रीयकृत बॅंकेत नाहीत अशा लाभाथ्‍र्यांनी त्यांचे खाते तात्काळ नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत काढून बॅक खाते क्रमांकाची छायांकीत प्रत व संमतीपत्र, आधार कार्ड, मोबाईल क्रमांकासह तात्काळ संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात तात्काळ दाखल करावेत, असे आवाहन तहसिलदार, तुळजापूर यांनी केले आहे.