उस्मानाबाद,दि.7:-
जिल्ह्यात 8 ते 19 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुंबई
पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात
आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या
कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची
वाहतूक करण्यास बंदी राहील.
आवेशी
भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यतेस व नीतीमत्तेस
बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य
वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून
दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाहीत.
तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र
येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा
भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि. 8 ते 19 नोंव्हेबर,
2016 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.