Thursday, 10 November 2016

“आमच गाव आमचा विकास” साठी जिल्हा परिषदने कंबर कसली


उस्मानाबाद, दि.10:- जिल्हयाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधांच्या निर्मितीकडे भर देवून शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती कडे लक्ष देवून गावाचा विकास साधावा,असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी आमचा गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.
    या कार्यशाळेस जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालिका डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) तुकाराम देवकर तसेच जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी  व विभाग प्रमुख तसेच केंद्रीय सूचना  केंद्राचे संचालक श्री. कोंडेकर प्रमुख उपस्सिथत होते.
जिल्हा परिषद च्या कृषी, शिक्षण ,महिला बाल कल्याण, पशुसंवर्धन ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  आमचा गाव आमचा विकास करिता कृती आराखडयाचे सादरीकरण केले. सादरी करणात मुख्य कार्याकारी अधिकारी आनंद रायते यांनी संबधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनीही मार्गदर्शनपर भाषण करुन माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासिकाचे शासकीय विविध वेबसाईड्सचे  महत्व पटवून देवून आमचं गाव आमचा विकास ही संकल्पना अधिक यशस्वी करता येईल याचे महत्तव उपस्थितांना पटवून दिले आणि उस्मानाबाद जिल्हयात मोठ्या संख्येने  लोकराज्यग्राम करावेत,असे आवाहन केले.