Saturday, 12 November 2016

राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन संपन्न


उस्मानाबाद,दि.12:-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानूसार दिनांक 12 नोव्हेंबर 2016 रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले हाते. सकाळी 10.30 वाजता पक्षकार, संपादन मंडळ अधिकारी, विधीज्ञ मंडळ, जिल्हा सरकारी वकील यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने लोकअदालतीचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री आर.आर.देशमुख, प्राधिकरणाचे सचिव श्री एस.आर.पडवळ, भूसंपादन उपविभागीय अधिकारी श्री  मुळेअधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ श्री डी.बी.तोंडे, जिल्हा सरकारी वकील श्री एस.बी.जाधवर, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री अजित खोत, न्यायीक अधिकारीशासकीय अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, बॅंक अधिकारी, पक्षकार त्यांचे विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये प्राधिकरणाचे सचिव श्री एस.आर.पडवळ यांनी पॅनलनिहाय ठेवण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती  सांगितली.
            जिल्ह्यातून प्रलंबित प्रकरणांपैकी  दिवाणी स्वरूपाची(963), मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई  प्रकरणे (234),  भू-संपादन प्रकरणे (312),  फौजदारी स्वरूपाची (355) तडजोडपात्र प्रकरणे, धनादेशाची (924) प्रकरणे, दूरसंचार आणि विविध बॅंकेची (1626) प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती पैकी दिवाणी स्वरूपाची (177), मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई  प्रकरणे (57),  भू-संपादन प्रकरणे (116),  फौजदारी स्वरूपाची (22) तडजोडपात्र प्रकरणेधनादेशाची (20) प्रकरणे, दूरसंचार आणि विविध बॅंकेची (157 ) प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली.  मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई  प्रकरणांमधील पक्षकारांना रूपये 3 कोटी 35 लाख 77 हजार 029/- मावेजा देण्यात आलेला आहे. धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला रूपये 14 लाख 96 हजार 850/- वसूली  करून  देण्यात  आली.  भू-संपादन प्रकरणांमध्ये रूपये 2 कोटी 51 लाख 44 हजार 243/- मावेजा मंजूर होवून रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली आणखी काही प्रकरणांमध्ये तडजोडी होणार आहेत. याच लोकअदालतीमध्ये  एक्सकेडर  म्हणून  ग्राहक  मंचाची  47 प्रकरणे ठेवण्यात आली  त्यापैकी 33 प्रकरणे तडजोडीने  मिटविण्यात  आली असून  यामध्ये  रुपये 86 लाख 3 हजार 585/- रक्कमेची उलाढाल झाली.
            मोटार अपघात प्रकरण क्रमांक 81/2012 अर्चना विरूध्द सुखदेव या प्रकरणात सर्वाधिक म्हणजे रूपये 69 लाख 57 हजार 154 एवढ्या रक्कमेची भरपाई मंजूर होवून रक्कम त्याचवेळी न्यायालयात जमा करण्यात आली, या प्रकरणातील पक्षकार व त्यांचे विधीज्ञ श्री पी.डी.वाघमोडे, यूनायटेड  इंडिया विमा  कंपनीचे  विभागीय अधिकारी श्री डी. एन. नाखरे, श्रीमती श्रीजा जैन, श्री  दिनेश जामगे व त्यांचे विधीज्ञ श्री एस. पी. दानवे यांनी उत्तमरित्या तडजोड घडवून आणल्याबद्दल त्यांचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री आर.आर.देशमुख, जिल्हा न्यायाधीश व पॅनल प्रमुख श्री आर.एन.रोकडे, यांनी सुमन स्वागत केले.

            लोकअदालतीमध्ये पॅनलवर न्यायीक अधिकारी सर्वश्री एस. आय. पठाण, ए. पी. कानडे, एस. बी. देसाई, आर. के. राजेभोसले, एस. ए. जमादार, एन. सी. बोरफळकरसर्वश्रीमती डॉ.रचना तेहरा, एन. पी. पवार, ए. सी. पारशेट्टी तसेच इतर पंच म्हणून विधिज्ञ सदस्यांनी काम पाहिले.