उस्मानाबाद,दि.13:-कोजागिरी पोर्णिमेनिमित्त तुळजापूर
येथे तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोण्त्याही प्रकारचा
त्रास होणार नाही याकरिता संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांने अत्यंत चोखपणे आपआपली
जबाबदारी पार पाडावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज दिले.
कोजागिरी पोर्णिमेच्या
निमित्ताने सोलापूर, कर्नाटक, तेलंगणा आदी भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक
तुळजापूरला येतात त्यांच्या सोयी सुविधांसाठी नियोजनपूर्व आढावा बैठक तुळजापूर
येथील सर्किट हाऊस येथे जिल्हधिकारी तथा मंदिर संस्थानाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत
नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. भाविकांची गैरसोय
होवू नये यासाठी प्रकाश व्यवस्था,रस्ते दुरूस्ती ,पार्किग व्यवस्था, गर्दीवर
नियत्रंण ठेवण्यासाठी बॅरेगॅटींग, दर्शन रांगेकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक
लावण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य
विभागातील अधिकाऱ्यांना येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी
प्रथोमचाराची केंद्र सूरू करण्याची सूचना करण्यात आली.
पोर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर
भाविक गर्दी करत असल्याने रस्त्यावर दुकाने लावू नये, पाणपोई, चप्पल स्टँड,
घाटशीळला जाणाऱ्या रस्त्यावर जाणारे व येणाऱ्यासाठी फलक लावावे, पाण्याचे डबके, तलावाच्या
ठिकाणी, धोकादायक ठिकाणाचा फलक लावावा,अन्न छत्राच्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवूण
स्वच्छता राखावी व अन्नछत्र रस्त्याच्या बाजुला लावावे, यामुळे रस्ता बंद होणार
नाही याची काळजी घ्यावी.
त्याचबरोबर निश्चित केलेल्या
मार्गांवरून गाड्या सोडाव्यात, सर्व मार्गांवरील स्वच्छता कटाक्षाणे पाळावी.
ग्रामपंचायतींनी देखील स्वच्छतेबद्दल फलक लावावेत असे निर्देश संबंधित
अधिकाऱ्यांना यावेळी बैठकीत देण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक
पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी,अभयसिंह मोहिते,तहसिलदार तथा मंदिर
संस्थानाचे व्यवस्थापक सुतिज नरहरे, तहसिलदार दिनेश झांपले, नगरपालिका
मुख्याधिकारी राजीव बुबने, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोरूडे, उपमुख्यकार्यकारी
अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, अन्न व औषध प्रशासन
विभागाचे प्र.पाटील, सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकावाडी आदी उपस्थित होते.
