उस्मानाबाद.दि.18:-
जिल्हयात विधी साक्षरता शिबिरे घेण्यासाठी अशासकीय संस्थेकडून अधिस्विकृती आणि
सहायक अनुदानाकरीता सन 2017-18 या वित्तीय वर्षाकरिता प्रस्ताव मागविण्यात येत
आहेत. जिल्हयातील इच्छूक अशासकीय संस्थांनी प्रस्ताव दि.30 मे 2017 पर्यंत जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय,उस्मानाबाद येथे सादर करावेत,असे आवाहन जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी केले आहे.
जिल्हयात सन 2017-18 मध्ये विधी
साक्षरता शिबिरे घेण्यासाठी एका अशासकीय संस्थेचा प्रस्ताव जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या शिफारशीने
महाराष्ट्र राज्य विधी सेवा पा्रधिकरण, मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.
प्रस्तावासोबत सहायक अनुदान व संपूर्ण भरलेला
अधिस्विकृती फॉर्म असावा, अशासकीय संस्था निती आयोग पोर्टलवर नोंदणीकृत असणे
आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे असाधारण ओळख (Unique) असणे आवश्यक आहे, अशासकीय
संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अशासकीय संस्थेचा स्थापना लेख व अधिसंघ नियमावलीची प्रत,मागील तीन
वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल,संस्थेचा मागील आर्थिक वर्षाचा अहवाल, खर्चाचे
अंदाजपत्रक, अशासकीय संस्थेस विधी साक्षरता शिबिरामध्ये काम करीत असल्याचा अनुभव
कागदपत्रे, सन 2017-18 मध्ये जिल्हयात घेण्यात येणाऱ्या शिबिराचे ठिकाण आदी
कागदपत्रासह तीन प्रतीमध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.विधी सेवा
प्राधिकरणाकडून विधी साक्षरता शिबिर घेण्यासाठी प्रत्येक वर्षी अशासकीय संस्थेस
अनुदान देण्यात येते, अधिक माहिती, प्रस्तावासंबंधी नियमावलीसाठी जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे सचिव यांच्याशी संपर्क साधावा, असे ही कळविण्यात आले आहे.