उस्मानाबाद.दि.13:- दि. 30
जून 2017 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध
होण्याच्या दृष्टीने दहा हजार रुपयेच्या मर्यादेपर्यंत शासन हमीवर तातडीने कर्ज
देण्याचे निर्देश सर्व राष्ट्रीयेृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना शासन
निर्णय दि.14 जून 2017 व शुध्दीपत्रक दि.20 जून 2017 नुसार प्राप्त झालेले आहेत.
त्या अनुषंगाने जिल्हयातील दि. 30 जून 2017 रोजी
थकबाकीदार असलेल्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासन निर्णयानुसार खरीप
पिकासाठी दहा रुपयेचे तातडीचे कर्ज घेण्यासाठी त्या त्या गावातील शेतकऱ्यांनी
आवश्यक कागदपत्रासह आपले गाव दत्तक असलेल्या राष्ट्रीयकृत बँक,ग्रामीण बँक शाखेशी
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री.जगदाळे यांनी केले आहे.