Saturday, 29 July 2017

जिल्हयातील 1 लाख 35 हजार 627 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योनजेंतर्गत भरला हप्ता


उस्मानाबाद.दि.29:- पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत दि. 28 जुलै 2017 अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 1 लाख 25 हजार 621 शेतकऱ्यांनी, जिल्हयातील कॉमन सर्व्हिस सेंटरवर 9 हजार 966 शेतकऱ्यांनी असे एकूण 1 लाख 35 हजार 627 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा हप्ता भरला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी दिली आहे. 

            पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 साठी पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2017 असून ऑनलाईन पध्दतीने पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे त्यामुळे अंतिम मुदतीच्या वेळी ऑनलाईन पीक विमा हप्ता भरण्यासाठी गर्दी टाळण्याकरीता आत्ता पासूनच शेतकऱ्यांनी बँकेमध्ये व कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीक विमा हप्ता भरावा व नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून पीक संरक्षित करावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी केले आहे.