Saturday, 29 July 2017

पीक विम्यासाठी जिल्हयातील सर्व बँका रविवारी सुरु राहणार


 उस्मानाबाद, दि.29:- राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 मध्ये सहभागी होण्याकरीता 31 जुलै 2017 पर्यंत मुदत आहे. अंतीम दिनांकास शेतकऱ्यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्हयातील निम शहरी व ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व सहकारी बँका रविवार दि. 30 जुलै 2017 रोजी सुरु राहणार आहेत.

            तसेच ज्या बँकांना सोमवारी साप्ताहिक सुट्टी असेल त्या बँकादेखील सोमवार दि. 31 जुलै 2017 रोजी सुरु ठेवण्यात येणार आहेत असे मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे.