वि.स. वृत्त : 16
प्लास्टिक मुक्त उस्मानाबादसाठी शपथ
उस्मनाबाद, दि.2 : महात्मा गांधी यांच्या
150 व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी (सिंगल युज
प्लास्टिक मुक्तीसाठी) आज जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ घेण्यात आली. तसेच प्लास्टिक
मुक्तीसाठी यावेळी स्वाक्ष्ारी मोहिम घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा
मुधोळ-मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी श्री.मनोरे
यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील विविध
सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पंचायत संस्था तथा
सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील प्लास्टिकचे संकलन
करावे. तसेच पॉलिथिनचा व प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा
वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ-मुंडे यांनी यावेळी केले.
****
वि.स. वृत्त : 17
जिल्हाधिकारी
दीपा-मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण
उस्मनाबाद, दि.2 : महात्मा गांधी यांच्या
150 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील हुतात्मा स्मारक येथे महात्मा गांधी यांनी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सन
1936 मध्ये लावलेल्या झाडापासून तयार केलेल्या
रोपाचे वृक्षारोपण जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण
करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, विभागीय वनाधिकारी मच्छिंन्द्रनाथ
गायकर, नगर परिषदेचे मुख्यधिकारी श्री.मनोरे, तहसिलदार श्री. माने, स्वातंत्र्य
सैनिक राजाराम मारुती पडवळ, माजी सैनिक महादेव दगडु यादव यांच्यासह
अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****
वि.स. वृत्त : 18
जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
उस्मानाबाद,दि.2: जिल्ह्यात दि. 22 सप्टेंबर ते 14 ऑक्टोंबर या
कालावधीत श्री. तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सव तसेच 8 ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन, विधानसभा
निवडणूक-2019 आणि
उस्मानाबाद जिल्ह्यातील दूष्काळ सदृष्य परिस्थिती जिल्ह्यात विविध
प्रकारचे निषेध आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा
विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी
व कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याकरिता संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 1 ऑक्टोंबर, 2019 रोजीचे सकाळी 06.00 वाजल्यापासून
ते दिनांक 15 ऑक्टोबर, 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे
कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी
यांनी कळविले आहे.
त्यानुसार
शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त
कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार
नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार
नाही, किंवा
जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भा अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी
चिन्हे निशाणी, घोषणा
फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा
ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना
जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार
नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात
नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या
जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस
अधिकारी, शासकीय
कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी
यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी
एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****