Wednesday, 1 November 2017

उस्मानाबाद येथे महा रेशीम अभियानाचा शुभारंभ


उस्मानाबाद, दि.1:-  महाराष्ट्रात रेशीम उद्योगाचा विकास तळागाळातील, खेडयातील शेतकऱ्यांना माहिती व्हावा, या उद्देशाने महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने उस्मानाबाद येथे महा रेशीम अभियानाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्ह्यात 250 एकर नवीन तुती लागवडीचा लक्षांक दिलेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत नवीन शेतकऱ्यांची निवड करणेकरिता महा रेशीम अभियान राबवून गावो गावी कार्यक्रम व ग्रामसभा घेवून शासन निर्णयानुसार योजनेंतर्गतचे देय लाभ व रेशीम उद्योगाची कार्यपध्दती तसेच या उद्योगापासून मिळणारे उत्पन्न याबाबतची माहिती आणि शेतकऱ्यांना रेशीम उद्योग करण्यास प्रवृत्त करणे, मनरेगांतर्गत 229 एकर क्षेत्रावर तुती लागवड करण्यात आली असून 18 गावामध्ये 275 लाभार्थ्यांकडे कामे चालू आहेत.
सन 2018-19 मध्ये मनरेगांतर्गत तुती लागवड करण्यासाठी नवीन लाभार्थी करिता महा रेशीम अभियान दि.1 ते 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिलह्यातील शंभर गावामध्ये कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.   
यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार राहूल पाटील, जिल्हा रेशीम अधिकारी श्री.मुल्ला.एम.के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, रेशीम कार्यालयाचे  उस्मानाबाद समुह प्रमख श्री. एस.ई.इप्पर, बार्टी पुणेचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, केंद्रीय रेशीम मंडळाचे सह संचालक श्री.ए.पी.बागडे आदीसह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.