Sunday, 20 August 2017

मिशन 90 दिवस अभियानांतर्गत “हा पोळा…स्वच्छतेचा पोळा” उपक्रम


        उस्मानाबाद,दि.20:- ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत 02 ऑक्टोंबर 2014 पासून केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ची सुरुवात झाली आहे. सोमवार 21 ऑगस्ट 2017 पोळा सणानिमित्त जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पोळा… स्वच्छतेचा पोळा म्हणून सारजा करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे.
            मा. पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) हा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असून त्यात मा. मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य 31 मार्च 2018 अखेर हागंदारीमुक्त करण्याचे निर्धारीत केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्यावतीने उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण क्षेत्र हागंदारीमुक्त करण्यासाठी 02 जुलै 2017 पासून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन 90 दिवस अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यातून 02 ऑक्टोंबर 2017 अखेर उस्मानाबाद जिल्हा हागंदारीमुक्त करण्याचे निर्धारीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दि. 21 ऑगस्ट 2017 रोजी पोळा सणानिमित्त जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्हयातील सर्व गावांमध्ये जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग व मिशन 90 दिवसातील जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील सहभागी सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने पोळा… स्वच्छतेचा पोळा म्हणून सारजा करण्याचे निर्धारीत करण्यात आले आहे. 

            जिल्हाभरात या दिवशी बैलाच्या मिरणुकीप्रसंगी बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी आत्महत्या रोखणे व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर याविषयी शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संवाद साधण्याकरीता उक्त उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमातुन बैल मिरणुक प्रसंगी स्वच्छतेविषयी घोषवाक्य देत ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व कळावे व उघडयावरील हागंदारी प्रथा बंद व्हावी याकरीता शौचालय बांधा खास.. वापर करा चोवीस तास, एकच वादा शौचालय बांधा, हातात मोबाईल, घरात फोन, उघडयावर संडासाला जातय कोण, माइया मालकाने शौचालय बांधलय, तुइया मालकाचे काय, असे संदेश देत ही मिरणूक काढून या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थ यांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले आहे.