Saturday, 3 June 2017

माता-बाल मृत्यूदर कमी करण्यामध्ये परिचारिकांचा सहभाग महत्वाचा -डॉ.वडगावे



उस्मानाबाद,दि.2:- व्यक्तीच्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत परिचारिकाही आरोग्य संदर्भात महत्वाची भूमिका बजावते,तसेच माता बाल मृत्यू कमी करण्यासाठी परिचारीकांचा सहभाग महत्वाचा आहे,असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे यांनी येथे केले.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने पहिल्या शासकीय नर्सेसची कार्यशाळा डॉ.वडगावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी बोलत होते. माता बाल संगोपनातील अद्यावत माहिती  या विषयावर ही एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी  स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल वाघमारे, डॉ.सचिन देशमुख, डॉ.महेश कानडे,रुग्ण कल्याण समितीचे अब्दुल लतिफ शेख,सेवानिवृत्त अधिसेविका विमल पानसे, अधिसेविका श्रीमती सरस्वती थोरात आदीची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ.वडगावे म्हणाले की, परिचारकांना अद्यावत शिक्षण ही महत्वाचे असून परिचारकांनी अशा कार्यशाळेत सहभागी होऊन आपले ज्ञान अद्यावत करावे.

या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या व निरीक्षक श्रीमती अश्विनी बेले यांनी कार्यशाळेच्या महत्वाच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


या कार्यशाळेस प्राचार्य अरुण कदम,श्रीमती गोरे,सुनिता पोखरकर, रवी बसरगी,अमोल गरड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती जयश्री हेंगडे व सरस्वती खटींग यांनी केले तर आभार शासकीय नर्सिग कॉलेजचे प्राचार्य सिद्रामप्पा कोरळी यांनी केले.या कार्यशाळेसाठी जिल्हयातील परिचारिका मोठया संख्येने उपस्थित होत्या.