Sunday, 28 May 2017


जिल्हा वार्षिक योजनेचा योग्य नियोजनाने निधी वेळेत खर्च करा
                                                     -पालकमंत्री दिवाकर रावते
उस्मानाबाद,दि.28:- जिल्हयातील प्रशासकीय विभागाने जिल्हा वार्षीक योजनेच्या  प्रस्तावाची वेळेत तांत्रिक मान्यता घेवून जिल्हा वार्षिक योजनेचा निधीही वेळेत खर्च करावा, असे निर्देश खारभूमी विकास तथा पालकमंत्री  दिवाकर रावते यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना 2015-16 व 2016-17 या वर्षांचा आढावा घेण्यात आला यावेळी पालकमंत्री रावते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास  तथा सहपालकमंत्री महादेव जानकर,आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, कृषी विकास अधिकारी खोत,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  शिवाजी थोरात,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रावते पुढे बोलताना म्हणाले की, जिल्हयाला  उपलब्ध झालेला  निधी वेळेत खर्च करा, निधी वेळेत  नाही खर्च न झाल्यानंतर तो निधी समर्पित होत असल्याने जिल्हयाच्या विकासकामांचीही गती मंदावते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी कामाचे प्रस्ताव जलदगतीने प्रशासकीय मान्यता घेवून  कार्यवाही करावी..
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे  यांनी सन 2015-16 व 2016-17 च्या जिल्हा वार्षिक योजनेचे  सादरीकरण केले. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार जिल्हा वार्षीक योजना  सन 2016-17 मध्ये सर्वसाधारणसाठी  174 कोटी 92 लाख, अनुसूचित  जातीसाठी 62 कोटी 92 लाख तर आदावासी क्षेत्राबाहेरील अदिवासीकरिता उपयोजनासाठी 2 कोटी 15लाख 57 हजार मंजूर नियतव्यय असल्याचे सांगितले आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2017-18 करीता यंत्रणेने प्रस्तावित केलेला नियतव्यय विचारात घेवून व शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत रुपये 135 कोटी 58 लक्ष किंमतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अनुसूचित जाती उपयोजना करीता यंत्रणेने प्रस्तावित केलेला नियतव्यय विचारात घेवून व शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत रुपये 70 कोटी 89 लक्ष किंमतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण  गमे यांनी जिल्हा वार्षिक योजनाच्या खर्चाचे यापुढे  योग्य नियोजन केले जाईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हानियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 
शेतकऱ्याचे दु:ख जाणून घेवून
त्यांना मदत होईल अशा योजना राबवा
                                                      -पालकमंत्री दिवाकर रावते
उस्मानबाद:- शासनाने बळीराजा चेतना अभियांनतर्गत उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्हयांची निवड केली होती.त्या पार्श्वभूमीवर जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे दु:ख समजून घेवून त्याला मदत होईल या भावनेतून शासनाच्या योजना तडफेने राबवा,अशा सूचना पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास  तथा सहपालकमंत्री महादेव जानकर,आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, कृषी विकास अधिकारी खोत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  शिवाजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, आत्माचे प्रकल्प  संचालक विजय  हिरामेठ आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री रावते पुढे म्हणाले की, जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबाना येणाऱ्या खरीप हंगामासाठी बळीराजा चेतना अभियानातून बी -बियाणे खरेदीसाठी मदत करा.शेतकरी गटांना फिरता निधी देताना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांवर व्यवसाय करण्यासाठी मदत करा, बळीराजा चेतना अभियान हा आपल्या जिल्हयात पथदर्शी कार्यक्रम असून ही योजना राबविताना या जिल्हयाला आलेले अनुभव, निरीक्षण नोंदले गेले पाहिजे. बळीराजा चेतना अभियानातून जिल्हयातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत,  हे अभियान राबविताना धोरणात्मक निर्णय घेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे पाहावे अशा सूचनाही पालकमंत्री  रावते यांनी केली.

पालकमंत्री श्री.रावते यांनी यावेळी बळीराजा चेतना अभियानांतर्गत विविध विभागाने राबविलेल्या योजनांचा व उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी गमे यांनी या अभियानूत जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबाना पेरणीसाठी महाबीजचे बियाणे अनुदानावर वितरित करावे अशी सूचना केली.

जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी यावेळी फिरता निधी संदभा्रत माहितीचे सादरीकरण केले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.