Sunday, 28 May 2017

सर्वांनी समन्वयाने जिल्हयाचा सर्वांगीण विकास साधू या -पालकमंत्री दिवाकर रावते


                                                     
उस्मानाबाद,दि.28:- जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वय साधून धोरणात्मक निर्णय राबवूया, असे आवाहन परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज केली.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते.यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास  तथा सहपालकमंत्री महादेव जानकर,खासदार रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, सर्वश्री आमदार ज्ञानराज चौगुले, सुजितसिंह ठाकूर, राणाजगजितसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते, उप मुख्यकार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा, कृषी विकास अधिकारी खोत,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  शिवाजी थोरात,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री रावते म्हणाले की, जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीकविमा, विद्युत पुरवठा, भूसंपादन असे प्रश्न उपस्थित केले आहेत.त्या प्रश्नांचे अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करुन तातडीने निर्णय घ्यावेत, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. जिल्हयातील विकासाची कामे  निधीअभावी प्रलंबित आहेत त्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी पुरविला जाईल,असेही आश्वासन दिले. काही प्रश्न राज्यस्तरावरील असतील त्याचा वैयक्तिक पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

            यावेळी जिल्हयातील खासदार, आमदार महोदयांनी विकासात्मक प्रलंबित कामाबाबतच्या सूचनांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे असे सूचविले. यावेळी पालकमंत्री श्री.रावते यांनी आपल्या सर्व सूचनांचे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.यावेळी मागील सभेतील विविध विषयावर चर्चा होऊन त्याचे अनुपालन कशा प्रकारे केले आहे यावर चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.