उस्मानाबाद,दि.29:-
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहन शाळांना
शैक्षणिक सहलीसाठी त्यांच्या
मागणीनुसार राज्य परिवहन
बस देण्याचे नियोजन केले असून
सुरक्षित व किफायतशीर प्रवासाच्या
दृष्टीने सर्व शाळा व महाविद्यालयांनी प्राधान्याने राज्य परिवहन बसेसचा शालेय
सहलीसाठी वापर करावा असे, आवाहन
परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी केले
आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 250 आगाराच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळा-महाविद्यालयांनी
संबंधित आगाराच्या आगार प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य परिवहनचे
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत
सिंह देवोल यांनी
केले आहे.
दिवाळी सुट्टी
संपली की, शाळेच्या मुलांना वेध लागतात
ते शैक्षणिक सवलतीचे अजंठा-वेरूळ , महाबळेश्वर-पाचगणी,
मालवण, तारकली यासारख्या
जगप्रसिध्द पर्यटन स्थळांबरोबर मुंबई, पुणे व
कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक व
सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरांना
भेट देण्यासाठी राज्यातील असंख्य शाळा दिवाळीनंतर शैक्षणिक
सहलीचे आयोजन करतात. शालेय सहलींसाठी
राज्य परिवहन महामंडळामार्फत 50 टक्के सवलतीप्रमाणे बस
पुरविल्या जातात. विशेष
म्हणजे या प्रासंगिक कराच्या राज्य परिवहन बसेसला वगळण्यात
आल्याने शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत
किफायतशीर दरात शालेय सहलीचा
आनंद घेता येतो.
खाजगी
बसच्या असुरक्षित वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित प्रवाशांसाठी
विद्यार्थ्यांच्या पालकाकडून आग्रह धरला जातो. त्यामुळे वर्षांगणिक राज्य परिवहनच्या बसची
संख्या शैक्षणिक सवलतीसाठी
वाढत असल्याचे दिसून येते. मागील
वर्षी 15 हजार 388 इतक्या
राज्य परिवहन बस
शैक्षणिक सहलीसाठी करारबध्द
झाल्या होत्या.