Friday, 9 February 2018

आयकर कपात व आयकर विवरणपत्र दाखल कसे करावे कार्यशाळा संपन्न




उस्मानाबाद, दि.07 :-   इन्कम टॅक्स हा शासनाचाअत्यंत मोठा उत्पन्नाचा स्त्रोत आहे त्यामुळे इन्कम टॅक्स न भरणे, इन्कम टॅक्स भरणे आणि तो शासनाला न जमा करणे, इन्कम टॅक्स भरणे, शासनाला जमा करणे परंतु त्याचे तिमाही विवरणपत्र दाखल न करणे यापैकी कुठेही चुक झाली तर दंड, व्याज, याशिवाय गुन्हा दाखल होऊन शिक्षा देखील होऊ शकते अशी माहिती आयकर, लातूर विभागाचे अति. आयुक्त श्री. संदिपकुमार साळुंके यांनी दिली.
आयकर विभाग, औरंगाबाद व कर सल्लागार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  आयकर कपात व आयकर विवरणपत्र दाखल करणे या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. 
            यावेळी लातूर विभाग वार्ड 4 चे आयकर अधिकारी श्री. आर.एस. वाघमारे, नांदेड विभागाचे यु.एल. जोशी, उस्मानाबाद विभागाचे जी.एस. मैत्री, लातूर विभाग वार्ड 3 चे डी.एम. रंगदळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
            कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयकर, लातूर विभागाचे अति. आयुक्त श्री. संदिपकुमार साळुंके यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
श्री. साळुंके पुढे म्हणाले की, आपण शासकीय अधिकारी, कर्मचारी देशाच्या उभारणीला सहकार्य करत असतो, म्हणून इन्कम टॅक्स भरणे, इन्कम टॅक्स भरणे आणि तो शासनाला जमा करणे, इन्कम टॅक्स भरणे, शासनाला जमा करणे आणि त्याचे तिमाही विवरणपत्र दाखल न करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाला शासन चालविण्यासाठी सतत पैश्याची आवश्यकता असते, म्हणून शासन जिथे उत्पन्न निर्माण होतं त्या उत्पन्नावरच इन्कमटॅक्स आकारते, त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नित्यनियमाने आयकर भरणे आवश्यकच आहे.  
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. रविंद्र कदम, सूत्रसंचालन अमोल आण्णाप्पा लोहार, आभार दिपक भातभागे यांनी मानले. 
            या कार्यक्रमास जिल्हयातील शासकीय विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.