उस्मानाबाद,दि.29:- जिल्हाधिकारी
कार्यालय आणि पाणी फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या “दुष्काळाकडून समृध्दीकडे” छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
आ. राणाजगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.
सुधाकर आडे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सुभाष
चोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आदिंची
प्रमुख उपस्थिती होती.
या प्रदर्शनात दुष्काळावरील उपाययोजना
आणि वॉटर कप स्पर्धेत सर्वसामान्यांनी केलेले योगदान, दुष्काळ या समस्येवर मात करण्यासाठी
आतापर्यंत विविध गावांनी एकजुटीने येवून केलेल्या कामांचे छायाचित्रांचा समावेश होता.
या प्रदर्शनाची सुरूवात विविध जिल्हयांमध्ये दि.13 डिसेंबर पासून सुरु झाली असून या
वर्षी महाराष्ट्रातील एकूण 75 तालुक्यात “सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा” होणार आहे.
हे प्रदर्शन दि.30 डिसेंबरला दुपारी
3 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

