उस्मानाबाद,दि.17: जिल्हा परिषद, उस्मानाबाद
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत "स्वच्छता हीच सेवा" हे अभियान दि.
15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2017 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या प्रसंगी
आयोजित स्वच्छता रॅलीला पालकमंत्री दिवाकर
रावते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचे उदघाटन आज येथे झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी अनुप शेंगुलवार, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, परिवहन विभागाचे उपमहाव्यवस्थापक
मधुकर पटारे, प्रादेशिक अभियंता श्री. राठोड, विभाग नियंत्रक राजीव साळवे, उपविभागीय
अधिकारी चेतन गिरासे, कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण, नगरपरिषद मुख्याधिकारी
बाबासाहेब मनोहरे, व्यवस्थापक महारुद्र गालट, तहसिलदार सुजीत नरहरे, अनिल खोचरे, दिलीप
जावळे, यंत्र अभियंता श्री. बाशा, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. गोंजारी, उपयंत्र
अभियंता श्री. नगराळे, कामगार अधिकारी श्री. चंद्रकांत घाटगे, विभागीय अभियंता
श्री. राजगिरे, श्री. पवार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पालकमंत्री श्री. रावते
यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मध्यवर्ती
बसस्थानकासमोरील परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेचे महत्व सांगून प्रत्येक नागरिकाने
आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असे आवाहनही श्री . रावते यांनी यावेळी केले.
त्यानंतर श्री. रावते यांनी मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी
करुन बसस्थानकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून
घेतल्या तसेच काही सूचनाही केल्या.