Friday, 25 November 2016

फळपिकांचा विमा हप्ता भरण्यासाठी दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ


          उस्मानाबाद , दि.25:- पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत  आंबिया बहारासाठी द्राक्ष, केळी , पेरु , मोसंबी, डाळींब  या फळपिकांचा विमा हप्ता  भरण्यासाठी  दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ  देण्यात  आली आहे . त्यानुसार  बँकांनी  कर्जदार  शेतकऱ्यांची घोषणापत्रे विमा कंपनीस सादर करण्याची  अंतिम तारीख दि.16 डिसेंबर 2016 व बँकांनी बिगर  कर्जदार शेतकऱ्यांची  घोषणापत्रे  विमा कंपनीस  सादर करण्याची  अंतिम तारीख  दि. 5 डिसेंबर 2016 राहील .
           दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत द्राक्ष , केळी , मोसंबी, पेरु, डाळींब या  पाच  फळपिकांकरिता  हवामान  धोक्याचा  कालावधी  कायम ठेवून विमा हप्ता  भरण्यास  मुदत वाढ  देणेबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स व बजाज अलायन्झ  या योजनेत सहभागी असलेल्या विमा कंपन्यांनी सहमती  दर्शविली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक  शिरीष जमदाडे यांनी कळविले आहे.