उस्मानाबाद , दि.25:- पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा
योजनेंतर्गत आंबिया बहारासाठी द्राक्ष,
केळी , पेरु , मोसंबी, डाळींब या
फळपिकांचा विमा हप्ता भरण्यासाठी दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे . त्यानुसार बँकांनी कर्जदार
शेतकऱ्यांची घोषणापत्रे विमा कंपनीस सादर करण्याची अंतिम तारीख दि.16 डिसेंबर 2016 व बँकांनी
बिगर कर्जदार शेतकऱ्यांची घोषणापत्रे
विमा कंपनीस सादर करण्याची अंतिम तारीख
दि. 5 डिसेंबर 2016 राहील .
दि. 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत द्राक्ष , केळी ,
मोसंबी, पेरु, डाळींब या पाच फळपिकांकरिता
हवामान धोक्याचा कालावधी
कायम ठेवून विमा हप्ता
भरण्यास मुदत वाढ देणेबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स व बजाज
अलायन्झ या योजनेत सहभागी असलेल्या विमा
कंपन्यांनी सहमती दर्शविली असल्याचे
जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे यांनी
कळविले आहे.