Sunday, 2 October 2016

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

उस्मानाबाद, दि.2 : आपल्या संपूर्ण आयुष्यातील आचरणातून आणि विचारांमधून जगाला शांतता , मानवतावाद , संहिष्णुता , बंधुभाव यांचा संदेश दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे , उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी , तहसिलदार राजकुमार माने, यांच्यासह कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते