उस्मानाबाद,दि.25:-
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमन 2013 अंतर्गत समाविष्ट करावयाच्या ज्या शिधापत्रिकाधारकाकडे
आधार क्रमांक उपलब्ध नसेल,अशा जिल्हयातील सर्व लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक
अद्याप संबधित रास्तभाव दुकानदार,कार्यालय यांच्याकडे उपलब्ध करून दिलेला नसेल
त्यांनी दि.15 नोव्हेंबर 2016 पर्यंत आधार
क्रमांक उपलब्ध करुन देण्यात यावा, अन्यथा लाभार्थी यादीतून नावे कायमस्वरुपी वगळण्यात येवून अन्नधान्याचा
लाभ दिला जाणार नाही असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
ज्या स्वस्त धान्य
लाभार्थींनी अद्याप पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नसेल अशा अंत्योदय अन्न
योजना, प्रधान्य कुटुंब योजना, एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी योजनेतील सर्व
लाभार्थ्यांनी दि. 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत आधार क्रमांक संबंधित रास्तभाव दुकानदारकडे उपलब्ध करुन
देण्यात यावा, तरी ज्या लाभार्थ्यांना सध्या अन्न धान्याचा लाभ मिळत आहे, परंतू
ज्यांनी अद्याप आपला आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही, अशा सर्व
लाभार्थ्यांची नावे दि.16 नोव्हेंबर 2016 पासून यादीतून कायमस्वरुपी वगळण्यात
येवून त्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही.आधार क्रमांक न दिलेल्या सर्व योजनेतील लाभार्थ्यांनी दि.15 नोव्हेंबर 2016 पर्यंत आधार क्रमांक
उपलब्ध करुन देण्यात यावे अशी सूचना जिल्हा
पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.