Tuesday, 12 December 2017

उस्मानाबाद जिल्ह्यात 34 हजार 599 शेतकऱ्यांना 175 कोटीची 10 लाखाची कर्जमाफी


उस्मानाबाद,दि.12:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत पात्र कर्जदार असलेल्या  34 हजार 599  शेतकऱ्यासाठी आतापर्यंत  शेतकऱ्यांना 175कोटी 10 लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी थकबाकी कर्जदार 23 हजार 129 शेतकऱ्यांसाठी 148 कोटी 90 लाख रुपये तर प्रोत्साहनपर कर्जदार 11 हजार 470 शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 19 लाख रुपये रक्कम कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत विविध राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या आतापर्यंत तीन ग्रीन यादया जाहीर  झाल्या आहेत. जिल्ह्यातील 82 हजार 538 शेतकरी या योजनेंतर्गत पात्र ठरले आहेत. यात पात्र कर्जदार शेतकऱ्यांना आतापर्यंत 175 कोटी 10 लाख 47 हजार 294 रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.

            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून  या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त झाले असून  छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून त्यापैकी जवळपास41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आले असून जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार येणार असून  शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल.