Thursday, 15 September 2016

जनतेचा विश्वास …जनतेशी संवाद “संवाद पर्व” उस्मानाबाद आकाशवाणी केंदा्रवरून प्रसारित




उस्मानाबाद,दि.15:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली  गणेशोत्सवात जनतेला शासकीय योजनांविषयीचे जनजागरण व्हावे याकरिता संवाद पर्वहा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाच्याअनुषंगाने शासनाच्या विविध योजनांची माहिती आकाशवाणी सारख्या लोकप्रिय माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचावी याकरिता आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद चे केंद्र संचालक संजय बरिदे यांनी पुढाकार घेतला.
या संवाद पर्व कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, स्वच्छ भारत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रमाकांत गायकवाड, समाजकल्याण अधिकारी एस. एम. मिनगिरे, जिल्हा रूग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे आणि लघुसिंचन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर हे अधिकारी सहभागी झाले होते. या अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती जनतेला आकाशवाणीच्या माध्यमातून दिली.

या कामात आकाशवाणी केंद्र उस्मानाबादचे प्रसारण अधिकारी कृष्णा शिंदे आणि कार्यक्रम निर्माता संजय पाटोळे यांनी मोलाचे सहकार्य केले.