उस्मानाबाद,दि.20:- जिल्हाधिकारी
कार्यालयात आज माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त
परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत शपथ घेवून सद्भावना दिन
साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी
उध्दव घुगे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) अरविंद लाटकर, तहसिलदार (महसूल) राजकुमार
माने, नायब तहसिलदार ए. पी. जाधव, एन.आर. सूर्यवंशी आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.