उस्मानाबाद,दि.30:-सामाजिक
न्याय व विशेष सहाय विभाग, मंत्रालय मुंबई यांचे संकल्पनेतून इयत्ता 10 वी मधील 85
टक्केपेक्षा जास्त गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक भवन येथे आय.ए. एस. प्रशिक्षणार्थी आयुष प्रसाद
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या
मार्गदर्शन शिबिरासाठी जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थी/ विद्यार्थीनी बहुसंख्येने
उपस्थित होते.या करिअर शिबिरासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण एस.एस. शेळके , समाज
कल्याण अधिकारी अमोल घवले व कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या
सुरूवातीस सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
मार्गदर्शन करतांना आयुष प्रसाद म्हणाले की, इयत्ता 10 वी
नंतर भारतामध्ये उपलब्ध असलेल्या संधीबाबत बहुमोल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच
एम. पी. एस. सी. व यु. पी. एस. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विविध उपाय
यावेळी सुचविले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहायक आयुक्त, समाज कल्याण
श्री. एस. एस. शेळके यांनी आयुष प्रसाद यांच्या बहुमोल मार्गदर्शनाबाबत व या करिअर
मार्गदर्शन शिबिरास उपस्थित असलेल्या सर्वांचे त्याबद्दल आभार व्यक्त केले.