वृत्त क्रमांक-410 दि.29
जून 2019
शेतकऱ्यांना शेवगा पिकाचे बियाणे वाटप
शिवार फाउंडेशन संचलित शिवार संसदचा स्तुत्य उपक्रम
उस्मानाबाद,दि.29:- जिल्ह्यातील
पाणीटंचाई, दुष्काळ परिस्थिती पाहता वाढता पाणी,शेती,पीक पध्दतीचा बदल करू
पाहण्याच्या दृष्टीने शिवार फाउंडेशनद्वारे प्रायोगिक तत्वावर शेवगा पिक लागवड
प्रचार, सल्ला व मार्गदर्शन व बीज वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेवगा
पिक हे कोणत्याही माती प्रकारात, कमी पाण्यात, कोणत्याही वातावरणात पोषक,
सातत्याने उत्पन्न देणारे, कमी कालावधीत फळ धारणा इ.दृष्टीने उपयुक्त असल्यामुळे या पिक लागवडीमुळे
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा, व उत्पन्न देणारे पिक ठरु शकते. यामुळेच शिवार संसद
युवा चळवळीमार्फत या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
उस्मानाबाद,
तुळजापूर तालुक्यातील मल्लिकार्जुन सारने, लतीफ शेख, काका रमखाब, सुभाष
पाटोळे,पाशुमिया शेख या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना शेवगा पिकाचे बियाणे वाटप
करण्यात आले. या पाच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारी वाढ, झालेला फायदा पाहून जिल्हाभर शेवगा
पिकांच्या लागवडीचा निर्णय घेण्यात येईल. यासाठी बायर कंपनी, अधिकारी
श्री.पुंरदरे, श्री.चैतन्या, राहुल पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कोळेकर,
शेतकरी मित्र राहुल जगताप, शिवार संसदचे विनायक हेगाणा, आकाशवाणीचे श्री.संजय
बरीदे आदी उपस्थित होते.
****
वृत्त क्रमांक-411
शासन रिक्त पदांची भरती महा-आयटी विभागाच्या
e-mahapariksha पोर्टलवरून होणार
उस्मानाबाद,दि.29:- महाराष्ट्र
राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठ्या प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत
शासन धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार भरती प्रक्रिया महा-आयटी (माहिती
व तंत्रज्ञान विभाग) या शासकीय विभागाच्या माध्यमातून e-mahapariksha या
पोर्टलवरून करण्यात येणार आहे.
त्यानुसार
महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची
कार्यवाही महा-आयटी (माहिती व तंत्रज्ञान विभाग) माध्यमातून करण्यात येणार आहे. या परीक्षेचे
पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती व तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरिक्षा
मार्फत होणार आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी
संगणकविषयक पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा किंवा कॉलेजची निवड करण्यात येऊन राज्यभरात
एकूण 122 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
प्रत्येक
परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहा पैकी एक मूळ फोटो ओळखपत्र आणणे अत्यावश्यक
आहे. पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत
बँकेचे पासबुक, आधार कार्ड. ओळखपत्र फेरफार करून तोतया उमेदवार येऊ नये यासाठी
फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध
ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या हॉल तिकीट
वर देण्यात आलेल्या आहेत.
महापरीक्षा
पोर्टल करून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा चालू असताना नियमांचे पालन केले जात आहे की
नाही तसेच काही गैरप्रकार होत नाही ना यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर
निरीक्षक म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रूम मध्ये परीक्षा नियंत्रक
म्हणून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापरीक्षा
पोर्टल वरील तसेच हॉल तिकीट वरील सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक
आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी किंवा तक्रार नोंदविण्यासाठी महापरीक्षा
पोर्टलच्या 180030007766 या टोल फ्री क्रमांकावर व enquiry@mahapariksha.gov.in या
ई-मेलवर संपर्क साधावा,असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
****