बसवंतवाडी
ग्रामस्थांचे काम कौतुकास्पद,आदर्शवत आणि अनुकरणीय
---जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे
उस्मानाबाद,दि.27:- बसवंतवाडी
गावाने स्वयंस्फूर्तीने दुष्काळातून मुक्त होण्यासाठी गेले महिनाभर कठोर परिश्रम
करून खोदलेले 4 हजार सीसीटी बंधारे कौतुकास्पद आहेत. बसवंतवाडी ग्रामस्थांचे काम
कौतुकास्पद,आदर्शवत आणि अनुकरणीय असून यापुढील काळात या कामास राज्य शासनाच्या
कृषी खात्यामार्फत अधिक प्रोत्साहन केले जाईल,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा
मुधोळ-मुंडे यांनी केले.
संपर्क
संस्था, मुंबई अंतर्गत आमदार संवाद मंच तुळजापूर यांच्याकडून सुरू असणाऱ्या
पाणीदार बसवंतवाडी मोहिमेमध्ये आज दि.27 जून रोजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे ,
पंचायत समिती
सभापती शिवाजी गायकवाड, तहसिलदार योगिता कोल्हे, तालुका कृषी अधिकारी नामदेव
गायकवाड,गुलचंद व्यवहारे,शामल पवार, प्रसाद पालवणकर, सुधीर कदम ,बाळासाहेब शिंदे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय जाधव, सरपंच श्रीमती देडे, उप सरपंच हरिभाऊ
भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष हनुमंत पारवे, आमदार संवाद मंच अध्यक्ष डॉ. सतीश
महामुनी, आमदार चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक बबन जाधव, हिराजी डे, माजी सरपंच श्री.
पाटील, शालेय समिती अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शीघ्र कवी प्रदीप पाटील, समाज सेवक
तानाजी शिंदे, समाजसेवक धनाजी धोतरकर, संभाजी बोबडे ,हनुमंत ताटे, ग्रामसेवक गोपाळ
करदोडे, ए. पी. ओ. किशोर शिंदे, पी. टी. ओ. श्रीपूर्ण कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे
रमाकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांचे स्वागत सरपंच
नंदाबाई देडे यांनी केले. पंकज पाटील, विकास भालेकर, भैरू मुळूक, हनुमंत पारवे, हरिभाऊ
भोसले यांच्या शुभहस्ते इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना 28
दिवसांमध्ये 4 हजार 300 सीसीटी बंधारे
खोदकाम करून बसवंतवाडी ग्रामस्थांनी दुष्काळाप्रति जागरूकता दाखवून दुष्काळाच्या
संकटातून मुक्त होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सलग एक महिना केलेले श्रमदान
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिशादर्शक आहे. याचे अनुकरण इतर दुष्काळग्रस्त गावांनी
करावे. उमेद महिला बचत गटामधून सर्व भागांमध्ये महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महिलांचे
वाढते योगदान स्पष्ट करणारे आहे. उमेद गटामधून शेळी वाटपाचे कार्यक्रम महिलांनी
हाती घ्यावे, त्यामुळे दर तीन आणि सहा महिन्यांनी महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढीस
लागेल,असे सांगितले.
त्या
पुढे म्हणाल्या, सीसीटी बंधारे खोदकाम केल्यामुळे बसवंतवाडी गावाचे पाणीटंचाईचे
संकट भविष्यात निश्चित दूर होणार आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून
बसवंतवाडी हे हिरवेगार नंदनवन होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. राज्य
शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवड आणि इतर योजनांचा लाभ घेऊन आपले
आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे मार्ग निर्माण करावेत. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य
करण्यास जिल्हा प्रशासन तयार आहे. भविष्यामध्ये बसवंतवाडी हे गाव महाराष्ट्र
राज्याच्या नकाशावर एक विकसित गाव म्हणून पुढे यावे आणि त्यामध्ये आमदार संवाद मंच
तुळजापूर यांनी घेतलेला पुढाकार देखील कौतुकास्पद आहे. सर्वांनी एकजुटीने पक्षीय
मतभेद दूर सारून हे राष्ट्रीय कार्य हाती घेतले आहे, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत.
यावेळी
बसवंतवाडीमधील महिला भगिनींना गवार, मेथी, टोमॅटो,पालक, भोपळा, मुळा, शेपू , भेंडी,
काकडी, मिरची, वांगे या भाज्या घरच्या घरी मिळाव्यात, यासाठी लोकप्रबोधन संस्था,आरळी (बु) या संस्थेच्या वतीने अध्यक्ष धनाजी
धोतरकर व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते उपस्थित महिलांना भाज्यांच्या
बियाण्यांची पाकीटे भेट देण्यात आले.
याप्रसंगी
पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड यांनी बसवंतवाडी या गावासाठी आमदार संवाद मंच
तुळजापूर पुढील कालावधीत विकासाचा आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा विचार करून
विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकसहभागामधून
शासकीय योजना राबविल्यास त्यामधून होणारी गावाची प्रगती मोलाची ठरणार आहे,
त्यादृष्टीने विविध 30 शासकीय योजना बसवंतवाडी येथे राबविण्यासाठी जाणीवपूर्वक
प्रयत्न केले जाणार आहेत असे सांगितले.
आमदार
संवाद मंच तुळजापूर चे अध्यक्ष डॉ. सतिष महामुनी यांनी प्रास्ताविक भाषण करताना
बसवंतवाडी हे गाव पाणीदार होण्याच्या अनुषंगाने जलसंधारणाचे मोठे काम हाती घेतले
आहे. संपूर्ण गावाचा या कामातील सहभाग हेच या यशाचे गमक आहे. नि:पक्षपातीपणे
लोकांचा सहभाग आणि प्रशासनाची मदत यामुळे बसवंतवाडीचा कायापालट होत आहे. पुढील पाच
वर्ष बसवंतवाडी या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचा
विडा उचलला आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा.अविनाश ताटे यांनी व आभार संपर्क संस्थेचे जिल्हा समन्वयक
अनिल आगलावे यांनी मानले.
जिल्हाधिकाऱ्यांची
बसवंतवाडी जिल्हा परिषद प्रशाळेस भेट
जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ-मुंडे यांचे जिल्हा परिषद प्रशाला, बसवंतवाडी येथे मुख्याध्यापक पोपट
उंबरे आणि इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी यांच्या हस्ते स्वागत करून वृक्षारोपण
करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी बसवंतवाडी येथे भेट दिल्यामुळे गेल्या महिनाभरापासून श्रमदान करणाऱ्या
सर्व ग्रामस्थांना मनापासून आनंद झाल्याचे चित्र होते. मात्र वयोवृद्ध अनेक
महिलांनी शासनाने आमच्या पोटासाठी काहीतरी दिले पाहिजे म्हणून मनरेगा अंतर्गत
कामाची मागणी केली तेव्हा जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी पुढील कामासाठी
आपण आजच मंजुरी देत असून संबंधित यंत्रणांनी कृषी विभागाच्या सूचनेनुसार मनरेगा
अंतर्गत पुढील काम करावे, असे आदेश दिले.
*****
वृत्त क्रमांक-406
सावित्रीबाई
फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या
सिद्धेश
बाळकृष्ण भवर चा व्यसनमुक्ती पथनाट्यात सहभाग
उस्मानाबाद,दि.27:- शाहू महाराज
जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिनानिमित्त यश मेडिकल फाऊंडेशन व
फ्युजन डान्स ड्रामा अॅकडमी, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद येथे
शिवाजी चौक व यशवंतराव चव्हाण सभागृह येथे व्यसनमुक्तीची नाटिका सादर केली. यावेळी
जिल्हाधिकारी व वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी हजर होते.
सावित्रीबाई
फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळंब येथील स्काऊट गाईड पथकातील सिध्देश
बाळकृष्ण भवर याने या पथनाट्यात व नाटिकेमध्ये सहभाग घेऊन दारू,तंबाखू, गुटखा व
इतर मादक द्रव्य मानवी शरीरात किती
घातक आहेत, याचा जनतेला पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
****
वृत्त
क्रमांक-407
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त
भैरवनाथ कानडे यांच्या "राजर्षी शाहूंचे
शैक्षणिक विचार"पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
उस्मानाबाद,दि.27:- तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील
सहशिक्षक तथा पत्रकार भैरवनाथ खंडू कानडे यांच्या "राजर्षी शाहूंचे शैक्षणिक
विचार " या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती
निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती दीपा
मुधोळ-मुंडे व उस्मानाबादचे जिल्हा
पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या शुभहस्ते दि.
26 जून रोजी करण्यात आले.
सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने येथील सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती राजर्षी
शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात
आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ
-मुंडे , प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस
अधीक्षक आर .राजा यांच्या शुभहस्ते व सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त
शिवानंद चिकुर्ते, समाज कल्याण
अधिकारी नागेश चौगुले,प्रा. डॉ.सतिश यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू
महाराजांची शिक्षणविषयक भूमिका अधोरेखित करणाऱ्या भैरवनाथ कानडे यांनी संपादित
केलेल्या "राजर्षी शाहूंचे शैक्षणिक विचार" या पुस्तकाचे प्रकाशन मोठया
उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ कवी योगीराज माने ,दलित मित्र
शंकर खुणे ,सुधाकर सगट, कैलास पवार, नवनाथ उपळेकर, पद्मिनताई वाघमारे आदीसह डॉ.
बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार व संत रविदास
पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त
विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****



