Friday, 10 August 2018

बळीराजा चेतना अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद शासकीय योजनांची शेतकऱ्यांना मिळतेय पुरेपूर माहिती


          जिल्ह्यामध्ये शासन बळीराजा चेतना अभियान राबवित असून हे अभियान पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय आणि क्रांतीवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद तालुक्यातील आंबेहोळ, आंबेवाडी, बावी, बेगडा, बेंबळी, चिखली, दाऊतपूर, देवळाली, धारूर, कौडगाव, नितळी, पाटोदा, पिंपरी, पोहनेर,  सुर्डी, शेकापूर, सोनेगाव, जहागीरदारवाडी, कसबेतडवळे,सांजा, तेर,अनसूर्डा, नांदूर्गा, बरमगाव, वडाळा, खानापूर,लासोना, गावसूद, वडगाव, टाकळी वाघोली,कोंड, कावलदरा,कौडगाव,बावी, वरवंटी, वाडीबामणी, रामवाडी, कावळेवाडी,, सांगवी, बामणी, येवती, मेंढा, वाखरवाडी, येडशी, भंडारी या गावांमध्ये तर भूम तालुक्यातील सांडेसांगवी, डोकवाडी, अंजनसोंडा, चाँदवड, सोनेवाडी, वंजारवाडी, दिंडोरी, उळूप,जांब, आंतरगाव, बरमपूर या गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून पोवाडे, भारुड, कीर्तन, भजन या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांमध्ये जगण्याची उमेद आणि जिद्द निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
या कार्यक्रमांस गटविकास अधिकारी श्री. चकोर,श्री. आर.एस.कांबळे,  विस्तार अधिकारी श्री. भांगे,श्री.बावीकर, वरील सर्व गावांचे ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शेतकरी आणि महिला यांनी उपस्थिती दर्शवून उत्तम प्रतिसाद दिला. या मान्यवरांनी जनजागृतीच्या माध्यमातून शेतकऱ्याची आत्महत्या थांबविण्याबाबत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचवावे यासाठी शेतकऱ्यांना सकारात्मक मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक शिवाजी पाटील यांनी या माध्यमातून  शासकीय योजनांबाबतची  माहिती देणारे असे कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
                                                              ***