उस्मानाबाद,
दि.31:- माहिती व जनसंपर्क महासंचलनालयांतर्गत उस्मानाबाद जिल्हा माहिती
कार्यालयच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात शासनाच्या विविध योजना अधिकाधिक
जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी "संवाद पर्व" या कार्यक्रमाचे आयोजन उस्मानाबाद
आकाशवाणी केंद्रावरुन करण्यात येणार आहे.
या "संवाद पर्व"
कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत
एकाच वेळी पोहोचावी यासाठी आकाशवाणी केंद्रावरुन विविध विभागाचे अधिकारी त्यांच्या
विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगणार आहेत.
यामध्ये
पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना "शेतकरी राजा आणि पशुधन" या
विषयावर सविस्तर माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव यांनी दिली.
सुशिक्षित बेरोजगारी सध्या एक समस्या
बनल्याने युवकांनी जास्तीत जास्त स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी
व्यवसायाभिमुख शिक्षण ही काळाची गरज असल्याने याबाबत "कौशल्य विकास आणि
उद्योजकता" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन औद्योगिक संस्थेचे डॉ.विकास जोंधळे
यांनी केले.
अवयवदानाबाबत समाजात जागरुकता वाढत
असली तरी अवयवदानाबाबतीत सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात,अवयवदाना
विषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. धनंजय पाटील व
डॉ.गजानन परळीकर हे "रुग्ण सेवा आणि अवयवदान" या विषयावर माहिती सांगितली.
शासनाच्या युवक व क्रीडा योजनाची
माहिती व युवकासाठी शासनाचे क्रीडा धोरण व "मिशन महाराष्ट्र फूटबॉल वन मिलियन"
या विषयी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक हे सविस्तर मागदर्शन करुन माहिती
सांगितली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे
लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र उपक्रमाची सविस्तर माहिती जिल्हा
माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी विषद केली..या कार्यक्रमासाठी आकाशवाणीचे
संजय बरिदे व कृष्णा शिंदे यांनी मुलाखती घेतल्या असून याचे प्रसारण रोज सकाळी
8.40 वाजता होणार आहे, तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.
